शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपासाठी वीज पुरवठा वीस तास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST

कधी पावसामुळे तर कधी पावसाअभावी शेतीचे नुकसान होते. याही परिस्थितीत शेतकरी शेती करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करतो. साकोली तालुक्यात ...

कधी पावसामुळे तर कधी पावसाअभावी शेतीचे नुकसान होते. याही परिस्थितीत शेतकरी शेती करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करतो. साकोली तालुक्यात रोजगाराच्या व इतर संधी उपलब्ध नसल्याने पारंपरिक शेती व्यवसाय सुरू आहे; मात्र या शेतीला लागणारा मुख्य घटक म्हणजे पाणी तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा बोरवेल आहेत, त्या शेतकऱ्यांना फक्त आठ तासाच्या भरवशावर शेती पिकवावी लागते. यासाठी शेतकऱ्यांनी बरेचदा आंदोलने, मोर्चे काढली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपयोग झाला तो फक्त काही महिन्यासाठीच.

सध्या साकोली तालुक्यातील गावात १६ तासांचे भारनियमन आहे. त्यामुळे कृषीपंपांना फक्त ८ तासच वीज पुरवठा मिळतो आहे; मात्र शेतशिवारातील डीपी या बिघाड अवस्थेतच आहे. त्यामुळे आठ तासातूनही चार पाच तासच वीज पुरवठा मिळतो. त्यामुळे पाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू असते. पावसाळ्यात कसेबसे निभतेही; मात्र उन्हाळ्यात शेतीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो; मात्र या वस्तुस्थितीकडे ना अधिकाऱ्यांचे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे.

बॉक्स

सिंचन प्रकल्प कधी पूर्ण होणार!

साकोली तालुक्यात तीन सिंचन प्रकल्प आहेत. यात चलंबंध नदीवर निम्नचुलबंध प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असले तरी हा प्रकल्प अजूनपर्यंत शेतीच्या कामात येत नाही. दुसरा प्रकल्प भीमलकसा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी या प्रकल्पातून पाणी जाण्यासाठी नाल्याचे काम अपूर्णच आहे. तर तिसरा प्रकल्प म्हणजे घानोड येथील. या प्रकल्पाला वनजमिनीचे ग्रहण लागले असून, आताही हा प्रकल्प वन कायद्यातच अडकलेला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प कामाचा नाही.

बॉक्स

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष

साकोली तालुक्यातील शेतशिवारात लावण्यात आलेल्या विजेच्या डीपी या मोठ्या प्रमाणात खराब अवस्थेत आहेत. वारंवार तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे या डीपी दुरुस्ती होत नाहीत. परिणामी, आता याऐवजी चार पाच तासच वीज पुरवठा मिळतो.

बॉक्स

शेतकरीच करतात डीपी दुरुस्ती

बऱ्याचअंशी डीपीतील फ्युज तुटण्याच्या तक्रारी आहेत. यासाठी लाइनमन यांना फोन केला जातो. हे लाइनमन कधी फोन उचलतात, कधी उचलत नाही. उचललाही तर उलट सुलट बोलून टाळाटाळ करतात. त्यामुळे शेतकरीच डीपीचे फ्युज टाकून लाइन सुरू करतात. एखादवेळी काही धोका झाल्यास जबाबदारी कुणाची!