शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातही सेंद्रिय शेतीसाठी तुमसर शेतकरी उत्पादन कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

भंडारा: रासायनिक खतांचा वापर वाढत चालल्याने आरोग्यासह शेतजमिनीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा व विषमुक्त ...

भंडारा: रासायनिक खतांचा वापर वाढत चालल्याने आरोग्यासह शेतजमिनीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा व विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी तुमसर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला आहे. यासाठी गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथील शेतकरी उत्पादक कंपनी सेंद्रिय शेतीसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, यासाठी सिंधपुरी येथील तुमसर शेतकरी उत्पादक कंपनीने कृषी विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ॲझोलाचे मोफत वितरण केले आहे. केंद्रीय शेती व प्रगत तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, या हेतूने सिंधपुरी येथील तरुण शेतकरी पवन कटनकार यांनी शेतकरी कंपनीची स्थापना केली. त्यानंतर पहिल्याच वर्षी परिसरातील पन्नास शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर गांडूळ खत वाटप केले. यातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा आलेला अनुभव व जमिनीचा पोत सुधारल्याने अनेकांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेतला. यावरच न थांबता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी व दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका कृषी अधिकारी विकास काळे यांच्या मदतीने जिल्ह्यातील सातही तालुक्यात कृषी सहाय्यकांमार्फत गरजू शेतकऱ्यांना ॲझोला मोफत वितरण केला. कटनकार यांच्याकडे ४० गाई आहेत. त्यामुळे त्यांना शेण व गोमूत्र याची कमतरता भासत नाही. यातूनच त्यांनी गांडूळ खत निर्मिती युनिट सुरू केले आहे. शेती व्यवसायासाठी गांडूळ खत निर्मितीचे शेतकऱ्यांना ते धडे देतात. शेतकरी उत्पादक कंपनीचे ३०६ सदस्य आहेत, तर शेतकरी कंपनीचे अध्यक्ष पवन कटनकार, सचिव रविशंकर रहांगडाले, डायरेक्टर महेंद्र गिरडकर, शशिकांत तोडणकर, लोकेश कटनकार, अक्षय शेंडे, दिनेश तुरकर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

कोट

शेतकऱ्यांनी भविष्याचा विचार करून सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय करून स्वतः गांडूळ खत निर्मितीसह सेंद्रिय शेती करावी. यासाठी मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲझोला मोफत देऊन सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करत आहे. याशिवाय आम्ही गांढूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शनही करतो.

पवन कटनकार, अध्यक्ष तुमसर शेतकरी उत्पादक कंपनी, सिंधपुरी

कोट

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर मर्यादितच करायला हवा. ॲझोलामुळे जमिनीचा पोत सुधारतो. यासोबत धानाच्या बांधीत टाकल्यास नत्राचा पुरवठा होऊन त्यामुळे युरिया वापरण्याची गरज भासत नाही. शेतीपूरक दुग्ध व्यवसाय केल्यास शेतीला शेणखत मिळेल आणि शेती उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात भरघोस वाढ होईल.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

कोट

पवन कटनकार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲझोलाचे मोफत वितरण केले, हा स्तुत्य उपक्रम आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी ॲझोलाची निर्मिती करावी व त्याचा वापर गुरांना चारा म्हणून अथवा धानपिकासाठी खत म्हणून करावा.

शांतीलाल गायधने, तंत्र अधिकारी, भंडारा