शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

उपजिल्हा रुग्णालयात गरम पाण्याने भागविली जाते तृष्णा

By admin | Updated: May 24, 2014 23:23 IST

सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याचे हमी घेणारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील पाच वॉटर कुलर पिण्याचे थंड पाणी मागील एक ते दीड महिन्यांपासून बंद आहेत.

तुमसर : सुमारे तीन लाख नागरिकांच्या आरोग्याचे हमी घेणारे तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील पाच वॉटर कुलर पिण्याचे थंड पाणी मागील एक ते दीड महिन्यांपासून बंद आहेत. या भीषण गर्मीत येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना गरम पाण्यानेच तृष्णा भागवावी लागत आहे. येथे अजुनपर्यंत स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले नाही.

जागतिक बँकेकडून आर्थिक मदतीने तुमसर शहरात शहर व तालुक्याकरिता तीन कोटी रूपये खर्च करून १00 खाटांचा रुग्णालय तयार करण्यात आला. राज्य शासनाने त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला. अधिक कर्मचारी येथे कार्यरत आहे. रुग्णालय प्रशासनाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकरिता पाच वॉटर कुलर रुग्णालयात लावले, परंतु सर्वच वॉटर कुलर मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे.

सध्या त्यातून गरम पाणीच बाहेर येत आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्यात हाताला चटके देणार्‍या पाण्याने तृष्णा कशी भागवणार, असा प्रश्न येथील शेकडो रुग्णांना पडला आहे. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेरील हॉटेलमध्ये पाण्याने तृष्णा भागवित आहेत. हॉटेल, चहा दुकानदारांना दुरून पाणी आणावे लागत असल्याने किती नागरिक व रुग्णांना पाणी द्यावे, असा सवाल त्यांनी केला आहे.

मध्यमवर्गीय रुग्ण व त्यांचे नातेवाईक दुकानातून पाण्याची बॉटल्स घेत आहेत. रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे. शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केल्यावर या वॉटर कुलरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याची माहिती दिली, परंतु तांत्रिक बिघाड केव्हा दूर करणार याबाबत काहीच सांगितले नाही. संपूर्ण उन्हाळाभर असेच गरम पाणी येथील रुग्णांना प्यावे लागणार, असे येथील चित्र दिसत आहे.

उष्माघात कक्ष नाही

एप्रिल, मे व जून महिन्याचा शेवटीपर्यंत पूर्व विदर्भात अतीशय कडक उन्हाळा असतो. प्रत्येक शासकीय रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्षाची स्थापना होणे गरजेचे आहे. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात अजूनपर्यंत स्वतंत्र उष्माघात कक्ष तयार करण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)