शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:37 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : ईटगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.पवनी तालुक्यातील ईटगाव येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक कोशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, सामाजिक वनिकरणाचे विभागीय अधिकारी आर.एन. विधाते, सहायक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनम ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता संजीव जगताप, सरपंच गुलचंद बांते, माणिक मरकाम, राजुराचे सरपंच शंकर मडावी, ग्रीन हेरिटेज संस्थेचे मोहम्मद शहीद शेख, शाहीद खान, पी.आर. बीडीकर, देवतारे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अतिथींनी वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ही मोहिम महिनाभर चालणार आहे.५४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५३ लाख ९९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात सर्वात मोठा वाटा वनविभागाकडे आहे. यात वृक्ष लागवडीसाठी सहा हजार २७ साईटची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्व प्रशासकीय विभागाने ५७ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन तयार केले असून यासाठी ५० लाख खड्डे खोदण्यात आली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर शासकीय, प्रशासकीय विभाग म्हणून उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. यात सार्वजनिक उपक्रमांतर्गत नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे