शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

धानाच्या उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण

By admin | Updated: June 22, 2014 23:54 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे

करडी (पालोरा) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी व आत्मा यंत्रणा भंडारा यांच्या सौजन्याने कृषी पर्यवेक्षक मोहाडी यांचेमार्फत करडी व मुंढरी सर्कलमधील १४ गावांमध्ये खरीप हंगामातील धानाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. श्री पद्धतीने भात लागवड कशी, करावी याची माहिती प्रोजेक्टरवर देण्यात आली. बिजप्रक्रिया, ऊस व केळी पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.खरीप हंगाम सन २०१४-१५ मध्ये भात पिकाचे उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने निलजबु, नरसिंगटोला, जांभोरा, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, किसनपूर, दवडीपार, पांजरा बोरी, बोरगाव, निलजखुर्द, मुंढरीखुर्द, खडकी, ढिवरवाडा आदी १४ गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत श्री पद्धतीने धान पिकाची लागवड कशी करावी, बिजप्रक्रिया करताना काय काळजी घ्यावी, बिजप्रक्रिया कशी करावी याचे स्वत: प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. भात लागवडीचे शेतकऱ्यांना एलसीडी प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ अधिकारी एन.के. चांदेवार, आत्माचे ब्लॉक टेक्निकल तथा व्यवस्थापक बोरकर, करडी व मुंढरी सर्कलमधील कृषी सहायक विश्वनाथ उसावे, हुकरे, मेश्राम, रंगारी यांनी मार्गदर्शन केले. श्री पद्धत लागवडीमुळे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढीव उत्पादन घेता येते. उत्पादन खर्चही कमी येतो. पाण्याची ५० टक्के बचत होते. पिक १० दिवस अगोदर कापणीस येतो, एकरी २ किलो बियाणे लागते त्यामुळे बियाण्यावरील खर्चात कपात होऊन बचत होते, अशी माहिती दिली गेली, सध्याच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर श्री पद्धतीने धानाची लागवड करावी, जास्तीत जास्त नफा कमवावा, अशी कळकळीची विनंतीही यावेळी मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना केली. भात लागवडीकरीता गादी वाफयावर रोपे तयार करणे, प्रत्यक्ष शेतात रोपांची लागवड करणे, तण नियंत्रण उपाययोजना, खते व पाण्याचा सुयोग्य वापर तसेच किड व रोग नियंत्रण उपाय यावर तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक करून दाखविण्याची तयारी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. कृषी सहायकाचे पथक त्यासाठी तयार केले जात आहे. (वार्ताहर)