शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

१५ दिवसात उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार ०६लोक०२ के तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे ...

रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार

०६लोक०२ के

तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार आहेत. त्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहने धावतील. सध्या रेल्वेचे तांत्रिक काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहतूक सुरू होणार आहे. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. कोरोनाकाळात उड्डाणपूल बांधकामाला फटका बसला होता.

मनसर-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपूल बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते. मागील दीड ते दोन वर्षात अरुणा संक्रमण काळात उड्डाणपूल बांधकामाला त्याचा फटका बसला. परंतु रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले.

सध्या रेल्वेचे काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. यात उड्डाणपुलाखालून रेल्वेच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू गेल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेकरिता उड्डाणपुलावर लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. ही जाळी येण्याची प्रतीक्षा रेल्वे करीत आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वे प्रशासन वाहतुकीला हिरवी झेंडी देणार असल्याची माहिती आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे तसेच रेल्वे प्रशासनाचेसुद्धा उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

वाहून जाणाऱ्या राखेमुळे प्रश्नचिन्ह

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल हा दगडी असून, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला भरावात राख घालण्यात आली होती. बांधकाम सुरू असताना दगडातून राख मोठ्या प्रमाणात बाहेर निघाली. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पोच मार्गावर मोठे खड्डे पडले होते. ते खड्डे बुजवण्यात आले. पुलातून राख बाहेर का पडत आहे याकरिता सर्वांनी बांधकाम विभागाने तज्ज्ञांना पाचारण केले होते. येथे एक तज्ज्ञांचे पथक येऊन गेले; परंतु दुसर्‍या तज्ज्ञांचे पथक येथे अजूनपर्यंत आलेले नाही अशी माहिती आहे. पुलावरून वाहतूक सुरू करताना प्रथम काही दिवस वाहनाने ट्रायल म्हणून धावणार आहेत त्यानंतर नियमित वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

रेल्वेने केलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरक्षेकरिता लोखंडी जाळी बसविण्याचे काम तेवढे शिल्लक आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वेकडून वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे.

- शिव दत्त, स्थापत्य अभियंता, रेल्वे