शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

राष्ट्रीय महामार्गावर होतोय वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत ...

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुजबी ते भिलेवाडापर्यंत उड्डाणपूल निर्मितीची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

दररोज दुपारी व सायंकाळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज आहे. महामार्गावर उड्डाणपूल मंजूर झाला असला तरी अद्याप काम सुरू झाले नसल्याने दररोज वाहनधारक कसरतीचा सामना करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते.

येथून दुहेरी वाहतूक सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी अरुंद रस्त्यामुळे अपघात घडले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती बळी जायचे, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून होत आहे.

त्यातच राष्ट्रीय महामार्गालगत अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच बळावला आहे. अनेक ट्रकचालक तसेच वाहनधारक फळे तसेच अन्य खरेदीसाठी आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी पाठीमागून भरधाव येणारी वाहने अचानक थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा नागरिकांकडून मागणी असताना असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

वाहतूक पोलिसांवरही कामाचा ताण वाढला

अनेकदा वाहनधारकांसोबत वादविवाद होत आहेत. अनेक वाहनधारक पोलिसांनाही न जुमानता निघून जातात. अशा वेळी अतिवेगाने जाणाऱ्या या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी उड्डाणपूल निर्मितीची गरज आहे. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. मात्र काही वाहनधारक कारवाईच्या भीतीने अतिवेगाने पळ काढण्याचा प्रयत्न करतात. वाहतुकीच्या सततच्या कोंडीमुळे वाहतूक पोलिसांच्या जिवालाही अपघाताचा धोका वाढला आहे.