शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

राष्ट्रीय महामार्गावर होतोय वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत ...

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुजबी ते भिलेवाडापर्यंत उड्डाणपूल निर्मितीची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

दररोज दुपारी व सायंकाळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज आहे. महामार्गावर उड्डाणपूल मंजूर झाला असला तरी अद्याप काम सुरू झाले नसल्याने दररोज वाहनधारक कसरतीचा सामना करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते.

येथून दुहेरी वाहतूक सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी अरुंद रस्त्यामुळे अपघात घडले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती बळी जायचे, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून होत आहे.

त्यातच राष्ट्रीय महामार्गालगत अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच बळावला आहे. अनेक ट्रकचालक तसेच वाहनधारक फळे तसेच अन्य खरेदीसाठी आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी पाठीमागून भरधाव येणारी वाहने अचानक थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा नागरिकांकडून मागणी असताना असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

वाहतूक पोलिसांवरही कामाचा ताण वाढला

अनेकदा वाहनधारकांसोबत वादविवाद होत आहेत. अनेक वाहनधारक पोलिसांनाही न जुमानता निघून जातात. अशा वेळी अतिवेगाने जाणाऱ्या या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी उड्डाणपूल निर्मितीची गरज आहे. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. मात्र काही वाहनधारक कारवाईच्या भीतीने अतिवेगाने पळ काढण्याचा प्रयत्न करतात. वाहतुकीच्या सततच्या कोंडीमुळे वाहतूक पोलिसांच्या जिवालाही अपघाताचा धोका वाढला आहे.