शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

राष्ट्रीय महामार्गावर होतोय वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत ...

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुजबी ते भिलेवाडापर्यंत उड्डाणपूल निर्मितीची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

दररोज दुपारी व सायंकाळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज आहे. महामार्गावर उड्डाणपूल मंजूर झाला असला तरी अद्याप काम सुरू झाले नसल्याने दररोज वाहनधारक कसरतीचा सामना करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते.

येथून दुहेरी वाहतूक सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी अरुंद रस्त्यामुळे अपघात घडले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती बळी जायचे, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून होत आहे.

त्यातच राष्ट्रीय महामार्गालगत अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच बळावला आहे. अनेक ट्रकचालक तसेच वाहनधारक फळे तसेच अन्य खरेदीसाठी आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी पाठीमागून भरधाव येणारी वाहने अचानक थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा नागरिकांकडून मागणी असताना असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

वाहतूक पोलिसांवरही कामाचा ताण वाढला

अनेकदा वाहनधारकांसोबत वादविवाद होत आहेत. अनेक वाहनधारक पोलिसांनाही न जुमानता निघून जातात. अशा वेळी अतिवेगाने जाणाऱ्या या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी उड्डाणपूल निर्मितीची गरज आहे. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. मात्र काही वाहनधारक कारवाईच्या भीतीने अतिवेगाने पळ काढण्याचा प्रयत्न करतात. वाहतुकीच्या सततच्या कोंडीमुळे वाहतूक पोलिसांच्या जिवालाही अपघाताचा धोका वाढला आहे.