शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

‘ट्रॅफिक’ वाढतोय!

By admin | Updated: May 12, 2015 00:36 IST

जिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन ...

वाहनांची संख्या वाढली : दुचाकी, चारचाकींची संख्या १७ हजारांवरदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. सन २०१४- १५ मध्ये जिल्ह्यात वाहनांची संख्या १६,९५२ आहे.भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ असून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढत आहे,, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या लोकसंख्या कमालिने वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांतही मोठी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे. सन २०१३-१४ मध्ये वाहनांची संख्या १६,३२१ होती. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. सन २०१४ -१५ मध्ये जिल्ह्यात १४ हजार ९७२ दुचाकी खरेदी करण्यात आली. यासह इतर वाहने मिळून जिल्ह्यात एकुण वाहन १६,९५२ एवढी आहेत. सन २०१३-१४ मध्ये १४,४७८ दुचाकीसह एकूण १६,३२१ वाहने होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुचाकींच्या संख्येत ४९७ ने वाढ झाली आहे. दुचाकी विक्रीत वाढयुवकांना आकर्षित करुन वेगवान धावणाऱ्या दुचाकींची आवड लक्षात घेऊन विविध कंपण्यांनी आकर्षित अश्या दुचाकी बाजारात आणल्या. त्यामुळे महागाईचा विचार न करता ही वडील मंडळींकडे दुचाकी खरेदी करण्यासाठी हट्ट धरताना दिसून येतात. सन २०१३-१४ मध्ये १४ हजार ४७८ दुचाकींची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आली होती. तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण १६ हजार ९५२ दुचाकीची नोंद करण्यात आली. तर सन २०१३-१४ मध्ये ९१० कार वाहन, तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण ७१६ कारची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत १९४ कारची घट झाली आहे. शहरात वाहतूक सिग्नलची गरजभंडारा शहरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच बाब ठरली आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, लाल बहादूर शास्त्री चौक, नागपूर नाका, खामतलाव चौक या ठिकाणी वाहतूक सिग्नलची अति आवश्यकता आहे. वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन वाहतूक सिग्नलविषयी अनेक वर्षांपासून तयारी दर्शवित असली तरी नियोजनाअभावी अद्यापही या दिव्यांविषयी जागरुक नाही. प्रायोगिक तत्वाचा अवलंब केल्यानंतर पुढची कारवाई थंडबस्त्यात आहे.