शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मित्राच्या स्मृतीत रक्तदान करून पंरपरा जोपासत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत ...

भंडारा : सर्व दानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रिय माणूस हे जग सोडून गेल्यावर त्यांच्या आठवणीत शोक करीत बसण्यापेक्षा त्या स्मृती सतत कायम राहाव्यात, या उदात्त हेतूने एकत्र आलेल्या युवकांच्या धडपडीने २००२ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुद्देशीय सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्यावतीने केले जात आहे.

सतत २० वर्षापासून शेकडो रक्तदाते या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करतात. हे युवक सामाजिक जाणिवेतून आपल्या लाडक्या मित्राच्या स्मृतीत रक्तदान करुन पंरपरा जोपासत आहे, असे प्रतिपादन युवा उद्योजक मुरारी काबरा यांनी केले. रवींद्रनाथ टागोर युवा मंचच्या वतीने येथील रवींद्रनाथ टागोर चौक गौरव कॉम्पलेक्समध्ये प्रकाश सव्वालाखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सन २००१ मध्ये प्रकाश सव्वालाखे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपल्या मित्राची एक आठवण म्हणून रवींद्रनाथ टागोर युवा मंच बहुउद्देशीय सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणीक संस्थातर्फे (दि.८ फेब्रुवारी) सोमवरला रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन भंडारा अर्बन बँकेचे संचालक डॉ. जगदीश निंबार्ते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता मुरारी काबरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडाऱ्याचे मनोज वंजानी, सामान्य रुग्णालय भंडाऱ्याच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवाने उपस्थित होते. दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जात असून वर्षभरात गरजू, थॅलेसेमिया तसेच विविध आजारातील रुग्णांना या संस्थेतर्फे रक्तपुरवठा केला जातो. सामान्य रुग्णालयातील टेक्निशियन डॉ. लक्ष्मीकांत वैद्य, डॉ. राजू नागदेवे, राहुल गिरी, पंकज कातोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नगरसेवक बंटी मिश्रा यांनी केले.

रक्तदात्यांमध्ये गौतम जैन, मनोज संघानी, करण काबरा, विनो कनोजे, राजू साठवणे, संजय मूल, आशिष मुनीश्वर, लोकेश मुटकुरे, स्वप्नील येवले, प्रशांत डोमळे, गोविंद नवारे, सारंग बेदरकर, शेषराव कुंभारे, भूषण मुटकुरे, हितेश ठाकरे, संजय चौधरी, जितू मुटकुरे, नरेंद्र मुटकुरे, सुधीर बिरणवार, सतपाल माहुले, पूनम तिवारी, श्रीकांत आंबाडारे, नीलेश सव्वालाखे, आशिष सूर्यवंशी, मनीष चौधरी, आकाश गंधे, संजय सव्वालाखे, अभय सूर्यवंशी, चंद्रकांत सार्वे, राघव सार्वे आदींचा समावेश होता.