शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रानडुकरांनी केले ऊसपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:46 IST

शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे. चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देचिखला शिवारातील प्रकार : शेतकऱ्यांवर संकट, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील चिखला परिसरात रानडुकरांनी शेतातील उभे ऊस पिकांची नासधुस करुन उध्दवस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे. वन्यप्राण्यांपासून पीकांचा बचाव कसा करावा. या विवंचनेत येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक शेतकरी येथे त्रस्त झाला आहे. प्रत्येकाचे किमान दोन ते तीन लाखांचे आर्थिक नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर संकट कोसळले आहे. रानडुकरांना हाकलून लावणे मोठे जिकरीचे व धोकादायक काम आहे.यासंदर्भात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. परंतु कारवाई शून्य आहे. पीकांचे नुकसानीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न त्यांना सतत भेडसावीत आहे. शेतात जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. उभ्या पिकांची नासाडी पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.चिखला परिसराला लागूनच जंगल आहे. त्यामुळे रानडुकरांच्या टोळ्या शेतातील उभी पीक नष्ट करीत आहेत. त्यांचा कायम बंदोबस्त वनविभागाने करण्याची गरज आहे. फटाके फोडून शेतकरी रानडुकर काही प्रमाणात परत पाठविण्यात यशस्वी होतात. परंतु रात्री व पहाटे पुन्हा रानडुकर उभ्या पिकांची नासाडी सतत करीत आहेत. वनविभागाने येथे कायम स्वरुपी उपाययोजना करुन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती