शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रानडुकरांनी केले ऊसपीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:46 IST

शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे. चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे.

ठळक मुद्देचिखला शिवारातील प्रकार : शेतकऱ्यांवर संकट, वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील चिखला परिसरात रानडुकरांनी शेतातील उभे ऊस पिकांची नासधुस करुन उध्दवस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे. वन्यप्राण्यांपासून पीकांचा बचाव कसा करावा. या विवंचनेत येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शेतशिवारापासून हाकेच्या अंतरावर जंगलाचे क्षेत्र सुरु होते. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.चिखला परिसरात मागील दोन वर्षापासून रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक शेतकरी येथे त्रस्त झाला आहे. प्रत्येकाचे किमान दोन ते तीन लाखांचे आर्थिक नुकसान वन्यप्राण्यांनी केले आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर संकट कोसळले आहे. रानडुकरांना हाकलून लावणे मोठे जिकरीचे व धोकादायक काम आहे.यासंदर्भात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली. परंतु कारवाई शून्य आहे. पीकांचे नुकसानीचा मोबदला अजूनपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न त्यांना सतत भेडसावीत आहे. शेतात जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. उभ्या पिकांची नासाडी पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.चिखला परिसराला लागूनच जंगल आहे. त्यामुळे रानडुकरांच्या टोळ्या शेतातील उभी पीक नष्ट करीत आहेत. त्यांचा कायम बंदोबस्त वनविभागाने करण्याची गरज आहे. फटाके फोडून शेतकरी रानडुकर काही प्रमाणात परत पाठविण्यात यशस्वी होतात. परंतु रात्री व पहाटे पुन्हा रानडुकर उभ्या पिकांची नासाडी सतत करीत आहेत. वनविभागाने येथे कायम स्वरुपी उपाययोजना करुन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने तथा माजी सरपंच दिलीप सोनवाने यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती