शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे तीनतेरा

By admin | Updated: April 15, 2017 00:26 IST

दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत.

नाल्यांमध्ये तुंबला कचरा : कचरा कंटेनर ओव्हरफ्लोइंद्रपाल कटकवार भंडारादीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत. नगरपालिका मध्ये सत्तापरिवर्तन होऊन चार महिन्यांचा कालावधी होत असला तरी शहराचे रंगरूप बदलेल अशी आशा होती. मात्र जिकडे तिकडे पसरलेला कचरा, दूषित पाणी पुरवठा, पार्किंगची अव्यवस्था, आठवडी बाजारातील दुरवस्था आदी समस्या अजूनही जैसे थे आहेत. तांदळाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी जशा सुविधा शहरवासीयांना अपेक्षित आहेत, तशा उपलब्ध नाहीत. दीड लक्ष लोकसंख् या असलेल्या भंडारा शहरात कुठेही महिलांसाठी शौचालय तथा मुत्रीघराची व्यवस्था नाही. उद्याने, अरुंद रस्ते व दूषित पाणी पुरवठा तसेच अतिक्रमणाचा फटका ही मुख्य बाबी शहराच्या विकासाला गालबोट लावत आहेत. विकासाचे राजकारण चालत असले तरी गल्लीबोळीतील अस्वच्छता मुख्य रस्त्यावर चर्चेचा विषठ ठरलेला आहे. ऐन बाजाराच्या दिवशी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. शहराची व्याप्ती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशी यंत्रणा आहे किंवा नाही ही बाब त्या विभागालाच ठाऊक असावी. ठिकठिकाणी कचरा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांची मानसिकता कचरा कंटेनर ऐवजी बाहेर फेकण्याचीच जास्त आहे. यासाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारीही हतबल आहेत. लक्षावधी रुपये खर्चून दाभा येथे घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संयत्र उभारण्यात आला होता. आजघडीला तो संयत्र धुळखात आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल घनकचरा व्यवस्थेपोटी होत असली तरी शहराचे सौंदर्यीकरण खरच कुठेतरी हरपले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची मानसिकता ही दोन प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत ठरताहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.