शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:44 IST

प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११ टक्के जलसाठा : दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता ४२.८१५ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ६.१६४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पात सध्या १४.३९ टक्के जलसाठा आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर तुमसर तालुक्यातील प्रकल्पात १९.८७ टक्के आणि बघेडा प्रकल्पात ९.३७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून त्यापैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील पवनारखारी, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील हिवरा, आमगाव, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी आणि लाखनी तालुक्यातील मुरमाडी (हमेशा) या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पात केवळ ९.३७ टक्के जलसाठा आहे.जिल्ह्यात २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. या प्रकल्पात सध्या ८.७५ टक्के जलसाठा असून त्यापैकी साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, परसोडी, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, लाखनी तालुक्यातील कन्हेरी, चान्ना, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, एकलारी आणि जांभोरा तसेच लाखांदूर तालुक्यातील दहेगाव मामा तलावांचा समावेश आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पीभवन होत असून प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने खाली होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.पावसाळा लांबल्यास स्थिती गंभीरगत काही वर्षांचा आढावा घेतल्यास भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यात दहा ते ११ टक्केच राहते. यावर्षीही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होऊ शकते. भंडारा हा जिल्हा टँकरमुक्त असल्याने कुठेही टँकर लावण्यात आला नाही. मात्र काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासन पाणी टंचाईच्या उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करीत असला तरी अधिनस्त यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.