शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:44 IST

प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११ टक्के जलसाठा : दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता ४२.८१५ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ६.१६४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पात सध्या १४.३९ टक्के जलसाठा आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर तुमसर तालुक्यातील प्रकल्पात १९.८७ टक्के आणि बघेडा प्रकल्पात ९.३७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून त्यापैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील पवनारखारी, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील हिवरा, आमगाव, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी आणि लाखनी तालुक्यातील मुरमाडी (हमेशा) या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पात केवळ ९.३७ टक्के जलसाठा आहे.जिल्ह्यात २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. या प्रकल्पात सध्या ८.७५ टक्के जलसाठा असून त्यापैकी साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, परसोडी, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, लाखनी तालुक्यातील कन्हेरी, चान्ना, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, एकलारी आणि जांभोरा तसेच लाखांदूर तालुक्यातील दहेगाव मामा तलावांचा समावेश आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पीभवन होत असून प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने खाली होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.पावसाळा लांबल्यास स्थिती गंभीरगत काही वर्षांचा आढावा घेतल्यास भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यात दहा ते ११ टक्केच राहते. यावर्षीही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होऊ शकते. भंडारा हा जिल्हा टँकरमुक्त असल्याने कुठेही टँकर लावण्यात आला नाही. मात्र काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासन पाणी टंचाईच्या उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करीत असला तरी अधिनस्त यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.