शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:44 IST

प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे११ टक्के जलसाठा : दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी तळाला जात असून २७ प्रकल्पांत तर पाण्याचा ठणठणाट आहे. दोन मध्यम, आठ लघु आणि १७ मामा तलाव कोरडे पडले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ११ टक्के जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची क्षमता ४२.८१५ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ६.१६४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पात सध्या १४.३९ टक्के जलसाठा आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर तुमसर तालुक्यातील प्रकल्पात १९.८७ टक्के आणि बघेडा प्रकल्पात ९.३७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून त्यापैकी आठ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील पवनारखारी, डोंगरला, मोहाडी तालुक्यातील हिवरा, आमगाव, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी आणि लाखनी तालुक्यातील मुरमाडी (हमेशा) या प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पात केवळ ९.३७ टक्के जलसाठा आहे.जिल्ह्यात २८ माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव आहेत. या प्रकल्पात सध्या ८.७५ टक्के जलसाठा असून त्यापैकी साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, परसोडी, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी, लाखनी तालुक्यातील कन्हेरी, चान्ना, मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, एकलारी आणि जांभोरा तसेच लाखांदूर तालुक्यातील दहेगाव मामा तलावांचा समावेश आहे. वाढत्या तापमानाने पाण्याचे बाष्पीभवन होत असून प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने खाली होत आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.पावसाळा लांबल्यास स्थिती गंभीरगत काही वर्षांचा आढावा घेतल्यास भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी उन्हाळ्यात दहा ते ११ टक्केच राहते. यावर्षीही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होऊ शकते. भंडारा हा जिल्हा टँकरमुक्त असल्याने कुठेही टँकर लावण्यात आला नाही. मात्र काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. प्रशासन पाणी टंचाईच्या उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करीत असला तरी अधिनस्त यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.