शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

‘त्या’ १८ जिगरबाजांचे सहा तास शर्थीचे प्रयत्न

By admin | Updated: August 16, 2014 23:17 IST

चार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर

नंदू परसावार - भंडाराचार दिवसांपूर्वी वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन नदीपात्रात कोसळलेली कार शोधण्यासाठी अनेक निष्णात आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर खमारी येथील १८ जिगरबाज तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नदीपात्रातील रेतीत घट्ट फसून असलेली कार शोधून काढली.मंगळवार दि.१२ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास भरधाव कार पुलावरुन नदीत कोसळली. त्यानंतर बेपत्ता कारचे शोधकार्य सुरू होते. प्रारंभी पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन कार शोधली परंतु त्यांना सापडली नाही. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नागपूर महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांना बोलावून कारचा शोध घेतला. परंतु, त्यांनाही कार आढळून आली नाही. त्यानंतर शुक्रवारला खमारी येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सदस्यांना बेपत्ता कार शोधण्यासाठी सांगण्यात आले. सकाळी १२ वाजतापासून या जिगरबाज तरुणांनी संस्थेच्या मालकीचे लाकडी डोंगे आणून शोधकार्य सुरू केले. दरम्यान, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शेखर वानाजी चांदेकर या ३० वर्षीय तरुणाच्या हाताला कारचा स्पर्श झाला. कारच आहे कां? याची चाचपणी करण्यासाठी त्याने आणखी एकदा खोल पाण्यात शिरला असता कारच्या समोरचे काच फुटून मृतकाचा एक पाय बाहेर असल्याचे त्याला दिसले. कार आणि कारमध्ये मृतक असल्याची खात्री पटताच त्याने ही माहिती सहकाऱ्यांना दिली. त्याच्या पाठोपाठ कुसन मेश्राम, प्रकाश चांदेकर, युवराज मेश्राम, धनराज मेश्राम, गोपीचंद केवट, इस्तारी मेश्राम, दिलीप मेश्राम, बबन मेश्राम, रामू मेश्राम, उमराव मेश्राम, कैलास चांदेकर, प्रभाकर मेश्राम, हरीश्चंद्र मेश्राम, स्वप्नील मेश्राम, जितेंद्र शेंडे, राकेश केवट, शैलेश भुरे, सुरेश चंदनबटवे आणि शेरु भुरे यांनी पाण्यात कार असल्याचे बघितले. २५ ते ३० फूट खोल पाण्यात फसलेल्या या कारची तीन चाके रेतीत फसून होती तर एक चाक वर दिसत होते.समोरच्या काचातून मृतकाचा डावा पाय काच फोडून बाहेर होता, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यानंतर कारला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु कार रेतील इतकी घट्ट फसून होती की, कारला बाहेर काढण्यासाठी हुक कुठे अडकवायचा त्यासाठी जागा मिळत नव्हती. दोरखंडाने बांधून काढण्याचा प्रयत्न केला असता दोरखंड तुटला. अखेर लोखंडी साखळीच्या सहाय्याने कारला हुक अडकविण्यात आला. हा हुक तीनदा निसटला. हुक अडकताच क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यासाठी नागपूर केंद्रीय आपत्ती नियंत्रण पथकाने पुढाकार घेतला. तरीसुद्धा कार शोधणे आणि बाहेर काढणे यासाठी सहा तासांपेक्षा अधिक तास या जिगरबाज तरुणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर पोलिसांनी कारमधून मृतदेह बाहेर काढला. आज या तरुणांची भेट घेतली असता ते म्हणाले, कारच्या समोरील भागाच्या डाव्या बाजुचा टायर फुटला होता. पुलावरच टायर फुटल्यामुळे कार नदीत कोसळली असावी, असे या मदत कार्यातील सुरेश चंदनबटवे व तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.