शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

‘त्यांना’ करावा लागतो पायदळ प्रवास

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.

एकोडी : गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे एक गाव असून हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. येथील भरताचे मोठे वांगे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून येथे मिरचीचे उत्पादन जास्त होत असल्याने या गावाला मिरची किन्ही सुद्धा म्हणतात. या गावातून एसटीची सोय नसल्याने येथील जनतेला प्रवाशांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना पायी पैदल किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावात भाजीपाल्याचे उत्पादन जास्त होत असले तरी बाजारपेठेपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी वर्गाला सुद्धा खाजगी वाहन वापरावे लागते.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे गाव दोन तालुक्याच्या सिमेवर असून लाखनी व साकोली तालुक्याला जोडणारे गाव आहे. जवळपास ८ ते १० वर्षापुर्वी या गावावरून बस सेवा सुरू होती. ती बस लाखनी वरून सालेभाटा मोरगाव किन्ही वरून येवून एकोडी येथे हालटींग करायची व सकाळी त्याच मार्गे पुन्हा लाखनीला परत जायची. या बसमुळे परिसरातील जनतेला प्रवाशांची सोय उपलब्ध झाली होती व एसटी विभागाला त्याचा आर्थिक फायदा पण झाला होता. लाखनी सालेभाटा मोरगाव किन्ही हा संपूर्ण डांबरीकरणाचा मार्ग आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून ही बससेवा बंद झाली असून ती आताही बंदच आहे. किन्ही येथून जवळपास एक कि़मी. अंतरावरील दाजीबा नगर पर्यंत साकोली डेपोची बस जाते. ही बस निलागोंदी मार्गे दाजीबा नगर वरून मोरगाव सालेभाटा मार्गे लाखनीला जाते व त्याच मार्गे परत जाते. ही बस सुद्धा किन्ही गावावरून जात नसल्याने जनतेला प्रवासाचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाल आहे. (वार्ताहर)