शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

‘त्यांना’ करावा लागतो पायदळ प्रवास

By admin | Updated: September 10, 2014 23:26 IST

गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.

एकोडी : गाव तेथे एसटी, सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे एसटी परिवहन विभागाचे ब्रीदवाक्य आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही या गावातून एसटी धावत नाही.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे एक गाव असून हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. येथील भरताचे मोठे वांगे संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून येथे मिरचीचे उत्पादन जास्त होत असल्याने या गावाला मिरची किन्ही सुद्धा म्हणतात. या गावातून एसटीची सोय नसल्याने येथील जनतेला प्रवाशांसाठी त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना पायी पैदल किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गावात भाजीपाल्याचे उत्पादन जास्त होत असले तरी बाजारपेठेपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी वर्गाला सुद्धा खाजगी वाहन वापरावे लागते.साकोली तालुक्यातील किन्ही मिरची हे गाव दोन तालुक्याच्या सिमेवर असून लाखनी व साकोली तालुक्याला जोडणारे गाव आहे. जवळपास ८ ते १० वर्षापुर्वी या गावावरून बस सेवा सुरू होती. ती बस लाखनी वरून सालेभाटा मोरगाव किन्ही वरून येवून एकोडी येथे हालटींग करायची व सकाळी त्याच मार्गे पुन्हा लाखनीला परत जायची. या बसमुळे परिसरातील जनतेला प्रवाशांची सोय उपलब्ध झाली होती व एसटी विभागाला त्याचा आर्थिक फायदा पण झाला होता. लाखनी सालेभाटा मोरगाव किन्ही हा संपूर्ण डांबरीकरणाचा मार्ग आहे. परंतु मागील कित्येक वर्षापासून ही बससेवा बंद झाली असून ती आताही बंदच आहे. किन्ही येथून जवळपास एक कि़मी. अंतरावरील दाजीबा नगर पर्यंत साकोली डेपोची बस जाते. ही बस निलागोंदी मार्गे दाजीबा नगर वरून मोरगाव सालेभाटा मार्गे लाखनीला जाते व त्याच मार्गे परत जाते. ही बस सुद्धा किन्ही गावावरून जात नसल्याने जनतेला प्रवासाचा मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाल आहे. (वार्ताहर)