शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

पार्किंगसाठी जागा पुरेना, रस्त्यावर तासन्‌तास वाहने उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST

भंडारा : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा दरवर्षी सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून ...

भंडारा : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा दरवर्षी सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून येते. आधीच अतिक्रमणाने बरबटलेल्या भंडारा शहरात पार्किंगसाठी जागाच नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील अपघाताच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे.

भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे त्यातही वाढते नागरीकरण यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. भंडारा शहरातील सर्वाधिक अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणून मुख्य मार्ग समजला जातो. याच मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असते.

लाल बहादूर शास्त्री चौक ते बसस्थानकापर्यंत हा रस्ता अत्यंत गजबजलेला असतो. मात्र या ठिकाणी पार्किंगसाठी कुठलीही सुविधा नाही पार्किंग नसलेले शहर म्हणून भंडारा शहराची ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात पार्किंग नसणे ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. वारुळातून मुंग्या निघाव्यात अशी वाहनेही रस्त्यावर धावत असतात. मात्र घर किंवा दुकान बांधताना पार्किंगसाठी नियोजन केले जात नसल्याने ही समस्या भविष्यात अधिकच उग्र रूप धारण करेल, यात शंका नाही.

कारवाईसाठी पोलीस यासह स्थानिक प्रशासनाचे लक्ष असले तरी याकडे नागरिकच सर्रास दुर्लक्ष करीत असतात. वारंवार सूचना देऊनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारसुद्धा सातत्याने घडत असतो.

बॉक्स

सम-विषम पार्किंगचा प्रयोग पूर्णत: फसला

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम-विषम व वन-वे पार्किंगचा प्रयोग राबविला. मात्र, हा प्रयोगसुद्धा जास्त दिवस टिकू शकला नाही. रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली. पण सम-विषम पार्किंगचा नियम कुणीही मान्य केलेला नाही.

बॉक्स

कारवाईचा अधिकार, अंमलबजावणी करणार कोण?

रस्त्यावर वाहने उभे केल्यास वाहनचालकावर कलम १२२ अंतर्गत वाहतूक नियंत्रण पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण याची अंमलबजावणी केल्यानंतरही तीच अवस्था दिसून येते. दुकानात आलेला ग्राहक थेट रस्त्यावरच आपले वाहने पार्क करीत असतो.

बॉक्स

महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफीस परिसरात सर्वाधिक कोंडी

भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफीस परिसरात या भागात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, याच भागात वाहन पार्किंगची सर्वाधिक समस्या आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवली जातात, तर काही चारचाकी वाहन मालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवतात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहन चालक व शहरवासीयसुद्धा त्रस्त झाले आहेत. पण यावर तोडगा काढण्यात नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभाग सध्या तरी अपयशी ठरले आहे.