शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण नाही

By admin | Updated: February 1, 2015 22:50 IST

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकसानीचा गेला. त्यामुळे उन्हाळी धानपिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली.

संजय साठवणे - साकोलीशेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकसानीचा गेला. त्यामुळे उन्हाळी धानपिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली. मात्र झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईच मिळणार नाही.दुबार-तिबार पेरणीमुळे उन्हाळी धानपिकाच्या रोवणीला यावर्षी उशीर झाला. त्यामुळे उन्हाळी धान पिकाच्या उत्पादनावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली. तरी अजुनही रोवणी झाली नाही. जसाजसा रोवणीला उशीर होईल. तसतसा पाण्याचे संकट ओठवणार आहे. म्हणजेच दरवर्षी होणाऱ्या सरासरी उत्पन्नात यावर्षी मोठी घट होणार आले. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप, रब्बी व उन्हाळी धानपिक याचा मिळणाऱ्या उत्पन्नात नुकसानच होणार आहे. यावर्षी पावसाळ्यात पावसाने दगा दिल्यानंतर शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. तर हिवाळ्यात थंडीने कहर केला. पारा ६ अंश सेल्सीअस पेक्षा कमीवर गेला. मात्र तीच परिस्थिती उद्भवल्याने शेवटी शेतकऱ्यांनी कृषि विभागाची मदत घेतली. तेव्हा खरे कारण समोर आले. मात्र यावर कृषि विभागही पर्यायी सोय करु शकले नाही. विभागामार्फत शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले असले तरी कृषि विभागाचे हे कंटाळून शेळ्या हाकण्याचा प्रकार दिसून येत होता. एवढे होवूनही या नुकसानीची साधी दखल घेण्यात आली नाही.