शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ...

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ही बाब लक्षात घेत मजीप्राने यंदाही पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण केले होते; मात्र मागील वर्षी चांगलाच पाऊस झाल्याने यंदाही मजीप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची अद्याप तरी पाळी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागील वर्षाप्रमाणे पुजारीटोलाचे पाणी न घेताच निघून जाणार असल्याचे वाटते.

जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

अशात गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पंचाईत होते. गोंदिया शहराला मजीप्राच्या माध्यमातून डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कमी पाऊस झाल्यास नदी अटली तर त्याचा परिणाम गोंदिया शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो.

यावर तोडगा म्हणून सन २०१७-१८ मध्ये गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असता, मजीप्राने पुजारीटोलाचे पाणी वैनगंगा नदीत सोडून शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढला होता.

त्यानंतर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बघता मजीप्राकडून दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार यंदाही मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे; मात्र मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे आतापर्यंत शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत नाही. म्हणूनच मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाकडे पाण्याची डिमांड दिली नसल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, आता मान्सून काही दिवसांवर आला असून, सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिली तर यंदाचा उन्हाळा असाच निघून जाणार व पुजारीटोलातील पाणी आणण्याची गरज पडणार नाही, असे बोलले जात आहे.

२०१८-१९ मध्ये आणले होते पाणी

गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने मजीप्राला सन २०१८ व २०१९ मध्ये पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. म्हणजेच सन २०१८ पासूनच या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सन २०२० मध्येही पाणी आणण्याची गरज पडली नव्हती, तर यंदा सध्यातरी तशी गरज दिसत नसल्याने यंदाही पाणी आणावे लागणार की नाही, हे काही दिवसांत समजणार आहे.

पुजारीटोला प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा

उन्हाळा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात असून, येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होणार आहे; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. शिवाय, दररोजची स्थिती बघता कधीही पाऊस बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही यंदा पुजारीटोला प्रकल्पात ५०.६४ टक्के पाणीसाठा दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घेता येईल.