शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ...

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ही बाब लक्षात घेत मजीप्राने यंदाही पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण केले होते; मात्र मागील वर्षी चांगलाच पाऊस झाल्याने यंदाही मजीप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची अद्याप तरी पाळी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागील वर्षाप्रमाणे पुजारीटोलाचे पाणी न घेताच निघून जाणार असल्याचे वाटते.

जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

अशात गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पंचाईत होते. गोंदिया शहराला मजीप्राच्या माध्यमातून डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कमी पाऊस झाल्यास नदी अटली तर त्याचा परिणाम गोंदिया शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो.

यावर तोडगा म्हणून सन २०१७-१८ मध्ये गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असता, मजीप्राने पुजारीटोलाचे पाणी वैनगंगा नदीत सोडून शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढला होता.

त्यानंतर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बघता मजीप्राकडून दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार यंदाही मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे; मात्र मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे आतापर्यंत शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत नाही. म्हणूनच मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाकडे पाण्याची डिमांड दिली नसल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, आता मान्सून काही दिवसांवर आला असून, सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिली तर यंदाचा उन्हाळा असाच निघून जाणार व पुजारीटोलातील पाणी आणण्याची गरज पडणार नाही, असे बोलले जात आहे.

२०१८-१९ मध्ये आणले होते पाणी

गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने मजीप्राला सन २०१८ व २०१९ मध्ये पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. म्हणजेच सन २०१८ पासूनच या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सन २०२० मध्येही पाणी आणण्याची गरज पडली नव्हती, तर यंदा सध्यातरी तशी गरज दिसत नसल्याने यंदाही पाणी आणावे लागणार की नाही, हे काही दिवसांत समजणार आहे.

पुजारीटोला प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा

उन्हाळा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात असून, येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होणार आहे; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. शिवाय, दररोजची स्थिती बघता कधीही पाऊस बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही यंदा पुजारीटोला प्रकल्पात ५०.६४ टक्के पाणीसाठा दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घेता येईल.