शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ...

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ही बाब लक्षात घेत मजीप्राने यंदाही पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण केले होते; मात्र मागील वर्षी चांगलाच पाऊस झाल्याने यंदाही मजीप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची अद्याप तरी पाळी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागील वर्षाप्रमाणे पुजारीटोलाचे पाणी न घेताच निघून जाणार असल्याचे वाटते.

जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

अशात गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पंचाईत होते. गोंदिया शहराला मजीप्राच्या माध्यमातून डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कमी पाऊस झाल्यास नदी अटली तर त्याचा परिणाम गोंदिया शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो.

यावर तोडगा म्हणून सन २०१७-१८ मध्ये गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असता, मजीप्राने पुजारीटोलाचे पाणी वैनगंगा नदीत सोडून शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढला होता.

त्यानंतर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बघता मजीप्राकडून दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार यंदाही मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे; मात्र मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे आतापर्यंत शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत नाही. म्हणूनच मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाकडे पाण्याची डिमांड दिली नसल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, आता मान्सून काही दिवसांवर आला असून, सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिली तर यंदाचा उन्हाळा असाच निघून जाणार व पुजारीटोलातील पाणी आणण्याची गरज पडणार नाही, असे बोलले जात आहे.

२०१८-१९ मध्ये आणले होते पाणी

गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने मजीप्राला सन २०१८ व २०१९ मध्ये पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. म्हणजेच सन २०१८ पासूनच या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सन २०२० मध्येही पाणी आणण्याची गरज पडली नव्हती, तर यंदा सध्यातरी तशी गरज दिसत नसल्याने यंदाही पाणी आणावे लागणार की नाही, हे काही दिवसांत समजणार आहे.

पुजारीटोला प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा

उन्हाळा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात असून, येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होणार आहे; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. शिवाय, दररोजची स्थिती बघता कधीही पाऊस बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही यंदा पुजारीटोला प्रकल्पात ५०.६४ टक्के पाणीसाठा दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घेता येईल.