शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...तर जिल्ह्यातील ६६ हजार वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार वाहने भंगारात काढली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही योजना ऐच्छिक असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.

भंडारा जिल्ह्यात विद्यमान घडीला दोन लक्ष ९० हजारांच्या घरात विविध प्रकारची वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र यातील वीस वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा झालेली जवळपास ६६ हजार ६२९ वाहने वीस वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. त्यामुळे नवीन स्क्रॅप पॉलिसी धोरणामुळे ही वाहने भंगारात काढली जाऊ शकतात. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांची ऐच्छिक मर्जी राहणार आहे. या धोरणांतर्गत खासगी वाहनांची वीस वर्षांनंतर, तर व्यावसायिक वाहनांची पंधरा वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करण्यात येईल. ही तपासणी शासनाने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये होणार आहे.

मात्र असे करताना ही चाचणी तांत्रिक व मानवविरहित राहणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. फिटनेस टेस्टमध्ये रद्द झालेली वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत, म्हणजेच ती भंगारात काढली जाणार आहेत.

या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाने ही घोषणा केली आहे. यात उल्लेखनीय म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व जुनी वाहने रस्त्यावरून नाहीशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

आगामी काळात शासनाच्यावतीने जुनी आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारी वाहने भंगारात काढली जाणार आहेत, अशी माहिती आहे.

वाहन स्क्रॅप करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या धोरणात नागरिक स्वखुशीने सहभागी होतील, अशी आशा निर्माण केली जाणार आहे.

जेणेकरून जुनी वाहने लवकरात लवकर रस्त्यावरून हटविण्यात येतील, असे सांगण्यात येते. या नवीन स्क्रॅप पोलिसीअंतर्गत सर्व वाहनांना ‘ऑटोमेटेड फिटनेस टेस्टिंग’ या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ती त्यांनी ही कोणत्याही बाब मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने कोणावरही आरोप-प्रत्यारोप होणार नाही. यात परिवहन विभागातर्फेही जनजागृती व नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. याबाबतीत वरिष्ठ पातळीवर कार्य सुरू असल्याचेही समजते.

स्क्रॅप धोरणामुळे प्रदूषण कमी करण्यात आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत होईल, तसेच नवीन वाहनांच्या मागणीमुळे वाहन उद्योगांची परिस्थिती सुधारेल, असा केंद्र शासनाचा अंदाज आहे. या पाॅलिसीला किती नागरिक सहकार्य करतील, ही येणारी वेळ ठरवेल.

आतापर्यंत असा होता नियम

- जुनी वाहने रस्त्यावरून हटविल्यामुळे आणि नवीन वाहने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास कोट्यवधी रुपयांचा आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. जुन्या नियमाप्रमाणे यापूर्वी वाहनांच्या प्रकारानुसार कधी पंधरा, तर कधी वीस वर्षानंतर वाहनांची टेस्टिंग करून वाहनांचे रिनीवल करण्यात येत होते; मात्र आता या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे जुनी वाहने अजूनही रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत.