शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

...तर जिल्ह्यातील ६६ हजार वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार वाहने भंगारात काढली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही योजना ऐच्छिक असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.

भंडारा जिल्ह्यात विद्यमान घडीला दोन लक्ष ९० हजारांच्या घरात विविध प्रकारची वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र यातील वीस वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा झालेली जवळपास ६६ हजार ६२९ वाहने वीस वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. त्यामुळे नवीन स्क्रॅप पॉलिसी धोरणामुळे ही वाहने भंगारात काढली जाऊ शकतात. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांची ऐच्छिक मर्जी राहणार आहे. या धोरणांतर्गत खासगी वाहनांची वीस वर्षांनंतर, तर व्यावसायिक वाहनांची पंधरा वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करण्यात येईल. ही तपासणी शासनाने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये होणार आहे.

मात्र असे करताना ही चाचणी तांत्रिक व मानवविरहित राहणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. फिटनेस टेस्टमध्ये रद्द झालेली वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत, म्हणजेच ती भंगारात काढली जाणार आहेत.

या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाने ही घोषणा केली आहे. यात उल्लेखनीय म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व जुनी वाहने रस्त्यावरून नाहीशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

आगामी काळात शासनाच्यावतीने जुनी आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारी वाहने भंगारात काढली जाणार आहेत, अशी माहिती आहे.

वाहन स्क्रॅप करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या धोरणात नागरिक स्वखुशीने सहभागी होतील, अशी आशा निर्माण केली जाणार आहे.

जेणेकरून जुनी वाहने लवकरात लवकर रस्त्यावरून हटविण्यात येतील, असे सांगण्यात येते. या नवीन स्क्रॅप पोलिसीअंतर्गत सर्व वाहनांना ‘ऑटोमेटेड फिटनेस टेस्टिंग’ या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ती त्यांनी ही कोणत्याही बाब मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने कोणावरही आरोप-प्रत्यारोप होणार नाही. यात परिवहन विभागातर्फेही जनजागृती व नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. याबाबतीत वरिष्ठ पातळीवर कार्य सुरू असल्याचेही समजते.

स्क्रॅप धोरणामुळे प्रदूषण कमी करण्यात आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत होईल, तसेच नवीन वाहनांच्या मागणीमुळे वाहन उद्योगांची परिस्थिती सुधारेल, असा केंद्र शासनाचा अंदाज आहे. या पाॅलिसीला किती नागरिक सहकार्य करतील, ही येणारी वेळ ठरवेल.

आतापर्यंत असा होता नियम

- जुनी वाहने रस्त्यावरून हटविल्यामुळे आणि नवीन वाहने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास कोट्यवधी रुपयांचा आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. जुन्या नियमाप्रमाणे यापूर्वी वाहनांच्या प्रकारानुसार कधी पंधरा, तर कधी वीस वर्षानंतर वाहनांची टेस्टिंग करून वाहनांचे रिनीवल करण्यात येत होते; मात्र आता या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे जुनी वाहने अजूनही रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत.