शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...तर जिल्ह्यातील ६६ हजार वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत निर्णय जाहीर झाल्यास जिल्ह्यातील जवळपास ६६ हजार वाहने भंगारात काढली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही योजना ऐच्छिक असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.

भंडारा जिल्ह्यात विद्यमान घडीला दोन लक्ष ९० हजारांच्या घरात विविध प्रकारची वाहने रस्त्यावर धावत आहेत. मात्र यातील वीस वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा झालेली जवळपास ६६ हजार ६२९ वाहने वीस वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. त्यामुळे नवीन स्क्रॅप पॉलिसी धोरणामुळे ही वाहने भंगारात काढली जाऊ शकतात. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांची ऐच्छिक मर्जी राहणार आहे. या धोरणांतर्गत खासगी वाहनांची वीस वर्षांनंतर, तर व्यावसायिक वाहनांची पंधरा वर्षानंतर फिटनेस सेंटरमध्ये तपासणी करण्यात येईल. ही तपासणी शासनाने ठरवून दिलेल्या फिटनेस सेंटरमध्ये होणार आहे.

मात्र असे करताना ही चाचणी तांत्रिक व मानवविरहित राहणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. फिटनेस टेस्टमध्ये रद्द झालेली वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत, म्हणजेच ती भंगारात काढली जाणार आहेत.

या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाने ही घोषणा केली आहे. यात उल्लेखनीय म्हणजे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व जुनी वाहने रस्त्यावरून नाहीशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

आगामी काळात शासनाच्यावतीने जुनी आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारी वाहने भंगारात काढली जाणार आहेत, अशी माहिती आहे.

वाहन स्क्रॅप करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या धोरणात नागरिक स्वखुशीने सहभागी होतील, अशी आशा निर्माण केली जाणार आहे.

जेणेकरून जुनी वाहने लवकरात लवकर रस्त्यावरून हटविण्यात येतील, असे सांगण्यात येते. या नवीन स्क्रॅप पोलिसीअंतर्गत सर्व वाहनांना ‘ऑटोमेटेड फिटनेस टेस्टिंग’ या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ती त्यांनी ही कोणत्याही बाब मानवी हस्तक्षेपाशिवाय असल्याने कोणावरही आरोप-प्रत्यारोप होणार नाही. यात परिवहन विभागातर्फेही जनजागृती व नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. याबाबतीत वरिष्ठ पातळीवर कार्य सुरू असल्याचेही समजते.

स्क्रॅप धोरणामुळे प्रदूषण कमी करण्यात आणि रस्ता सुरक्षा सुधारण्यास मदत होईल, तसेच नवीन वाहनांच्या मागणीमुळे वाहन उद्योगांची परिस्थिती सुधारेल, असा केंद्र शासनाचा अंदाज आहे. या पाॅलिसीला किती नागरिक सहकार्य करतील, ही येणारी वेळ ठरवेल.

आतापर्यंत असा होता नियम

- जुनी वाहने रस्त्यावरून हटविल्यामुळे आणि नवीन वाहने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास कोट्यवधी रुपयांचा आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. जुन्या नियमाप्रमाणे यापूर्वी वाहनांच्या प्रकारानुसार कधी पंधरा, तर कधी वीस वर्षानंतर वाहनांची टेस्टिंग करून वाहनांचे रिनीवल करण्यात येत होते; मात्र आता या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे जुनी वाहने अजूनही रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत.