शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

अंशदायी पेंशन योजनेचे कर्मचाऱ्यांना ‘टेंशन’

By admin | Updated: April 17, 2016 00:26 IST

अंशदायी पेंशन योजनेची मार्च २०१६ नंतर अचानकच अंमलबजावणी व वेतनातून मागील बॅकलॉग भरून काढण्यासाठी एकुण वेतनाच्या २० टक्के वेतन होणार असल्याने ...

कर्मचारी संकटात : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणार २० टक्के कपातराहुल भुतांगे/ गिरीधर चारमोडे तुमसर/ मासळअंशदायी पेंशन योजनेची मार्च २०१६ नंतर अचानकच अंमलबजावणी व वेतनातून मागील बॅकलॉग भरून काढण्यासाठी एकुण वेतनाच्या २० टक्के वेतन होणार असल्याने अंशदायी पेंशन योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्वच कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून ते आर्थिक 'टेंशन'ने ग्रासले आहेत.सन २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेंशन योजना बंद करून नवी अंशदायी पेंशन योजना सुरु केली. या नव्या पेंशन योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनापैकी १० टक्के रक्कम अंशदायी पेंशन योजनेच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेचे जुने स्वरुपात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के कपात व तेवढीच रक्कम शासन भरणार असे होते, असे मिळून २० टक्के रक्कम शासन धोरणानुसार गुंतवणूक करून त्यामधून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला विशिष्ट ऐवढी पेंशन शासन देणार आहे. यापैकी काही रक्कम विमा पॉलीसीमध्ये गुंतवणूक करण्याचा शासनाचा विचार होता. मात्र या योजनेच्या प्रारंभीच अंशदायी पेंशन योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या अंशदायी योजनेचा विरोध केला व प्रसंगी न्यायालयातही गेले. सन २००५ नंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनाातून १० टक्के रक्कम अंशदायी पेंशन योजनेसाठी कपात झाली. पण ते पैसे नेमके गेले कुठे? याबाबत कर्मचारी अनभिज्ञ राहिला. तर शासनाची १० टक्के रक्कम जमा झाली किंवा नाही याचेही उत्तर कर्मचारी वर्गाकडे शोधूनही सापडणार नाही. अंशदायी पेंशन योजना चांगली की वाईट, या वादात ती स्वीकारायची की नाकारायची असे असताना हा वाद २००५ ते २०१६ अखेर म्हणजे तब्बल ११ वर्षे चालला. मार्च २०१६ पासून अंशदायी पेंशनसाठी कर्मचाऱ्याच्या वेनातूून १० टक्के रक्कम कपात सुरु झाली. शासनाच्या अंशदायी पेंशनच्या धरसोडवृतीने व कर्मचाऱ्याच्या आक्रमकतेमुळे ही योजना रखडली. तेव्हा योजनेचे भविष्य काय? यापेक्षा कर्मचारी वर्गाने आपल्या पातळीवर भविष्याची गुंतवणूक केली. कुणी मोठ्या किंमतीचे घर तर कुणी जमीनी घेतल्या. त्याबरोबरच अन्यत्र विमा पॉलीसी व इतर ठिकाणी गुंतवणूक केली. त्यासाठी काढलेले कर्ज त्याचे हप्ते भरत असताना कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनापैकी ३० ते ४० टक्केच वेतन हातात येतो आणि त्यातच शासनाने अचानक अंशदायी नावाचा फतवा काढला. अंशदायी योजना चांगले की वाईट यापेक्षा जुनी पेंशन योजनाच हवी, असा कर्मचारी वर्गाचा अट्टाहास होता. अखेर ती शासनाने पुरविला नाही व कोणतीही पूर्वसूचना न देता पगारातून १० टक्के रक्कम ही चालू स्थितीची व मागील बॅकलॉग भरून काढण्यासाठी १० टक्के रक्कम असे एकूण २० टक्के कपात सुरु केली आहे. आधीच कर्मचारी वर्गानी केलेली गुंतवणूक व कर्जामुळे एकूण वेतनापैकी ३० ते ४० टक्के वेतन कर्मचाऱ्याच्या हातात येत असताना अंशदायी योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात भोपळा मिळणार आहे. त्यामुळे कौटुंबिक गरजा कशा भागवायच्या, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, या विवंचनेत कर्मचारीवर्ग सापडला आहे. आर्थिक गणित बिघडल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. यासाठी शासन पातळीवर विचार व्हावा अशी मागणी होत आहे.अंशदायी कर्मचारी पेंशन योजना ही कर्मचाऱ्यांच्या फायद्याचीच आहे. त्यामुळे कर्मचारी १० टक्के कपातीला मान्यता देत आहेत. मात्र अचानक २० टक्के होणारी कपात आर्थिक गणित बिडघवीत आहे. मागील बॅकलॉग भरून काढण्याकरिता कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी महागाई भत्ते व त्यातील फरक अंशदायी योजनेमध्ये जमा केल्यास यावर तोडगा काढता येवू शकतो.- आर.जी. गायकवाडशासकीय कर्मचारी, भंडारा.