शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार एकरात घेतले दहा लाखांचे भेंडीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:49 IST

तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन...

परजिल्ह्यात वाढली मागणी : वर्षभर १०० मजुरांना काम देण्याचा संकल्प, रेंगेपारच्या तरूण शेतकऱ्याची यशोगाथामोहन भोयर  तुमसरतुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन एक आदर्श प्रस्थापित केला आहे. गावात त्याला रोजगार हमी योजना असे नाव दिले असून येणाऱ्या पुढील काळात वर्षभरात १०० मजूरांना काम देण्याचा संकल्प केला आहे. या प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव सुभाष हिरबा निशाने (३९) रा. रेंगेपार असे आहे.सध्या सुभाष याने चार एकरात स्वत:च्या शेतीत भेंडीचे लागवड ३ डिसेंबर २०१५ ला केली होती. भेंडीचा प्रथम तोडा १० फेब्रुवारी २०१६ ला निघाला. प्रथम तोड्यात अडीच क्विंटल भेंडी निघाली. एक दिवसाआड १५ क्विंटल भेंडीचे उत्पादन निघत असून एका आठवड्यात ४५ क्विंटल भेंडी उत्पादन होते. सध्या भेंडीचा प्रति किलो २० ते २२ रुपये आहे.सहा पुरुष मजूर व ४१ महिला मजूर सुभाषकडे कामाला जातात. पुरुषाला प्रति दिवस २०० रुपये मजुरी तर महिलांना चार तासांचे ६० रुपये मजूरी दिली जाते. एका आठवड्यात ९० हजारांची भेंडी विक्री केली जाते. आतापर्यंत भेंडीचे २६ ते २७ तोडे झाले आहे. भेंडीचे पीक तीन महिने घेता येते. सुभाषने १,५७३ जे.के. जातीचे १४ किलो ग्रॅम भेंडीचे बियाणे ४५ हजार रुपयात खरेदी केले. एप्रिल महिन्यापर्यंत भेंडीचे उत्पादन घेतल्या जाणार आहे.एका आठवड्यातून दोनदा भेंडीला पाणी दयावे लागते. सुभाष ७० ते ८० हजार खतावर खर्च करावा लागला. भेंडी विक्री करिता गोंदिया येथील बाजारपेठेत नेली जाते. भेंडी रुचकर असल्याने गोंदिया बाजारपेठेत ही भेंडीला मोठी मागणी आहे.१० एप्रिलपर्यंत दुसरे काकडीची शेती ५ एकरात सुभाष लागवड करणार आहे. याकरिता ४० हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. मे महिन्यापर्यंत काकडीचे उत्पादन घेता येणार आहे. यातून अडीच ते ३ लाखांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. वांगी, भेंडी व नंतर काकडी शेत पिकावर ४० मजूर तर ऊस लागवडीवर ५० मजूर असे ९० मजूर १० महिने सुभाषकडे कामे करतात.सुभाषकडे स्वत:ची १२ एकर शेती असून ३४ एकर शेती तो भाड्याने वर्षभर करतो. गावात रोजगार नाही. रोजगाराकरिता मजूर गाव सोडून पलायन करतात. गावातच १२ महिने रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासनावर अवलंबूनन राहता रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प सुभाष याने केला आहे. शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वर्षातून ९० दिवस कामे उपलब्ध करुन देते, सुभाष त्याही पलीकडे जाऊन विचार करीत आहे.हेवा वाटावा असे काम शेती परवडत नसतांनी सुभाषने हाती घेतले व त्यात तो यशस्वी होत आहे. कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेचा तो सदस्य आहे. पंरतु प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र कृषी विभागाचे अधिकारी भेट देत नाही ही खरी शोकांतीका आहे. सुभाष यांची मजूरांप्रती तमळळ वाख्याण्यासारखी आहे, पंरतु भरघोष शेती उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर भेट देऊन आधूनिक पध्दतीने पीक कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- हिरालाल नागपुरे, गटनेता, पंचायत समिती, तुमसर