शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

चार एकरात घेतले दहा लाखांचे भेंडीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 03:49 IST

तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन...

परजिल्ह्यात वाढली मागणी : वर्षभर १०० मजुरांना काम देण्याचा संकल्प, रेंगेपारच्या तरूण शेतकऱ्याची यशोगाथामोहन भोयर  तुमसरतुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील एका मॅट्रीक उत्तीर्ण युवकाने वर्षातून दहा महिने ९० मजुरांच्या हाताला शेतीत काम देऊन एक आदर्श प्रस्थापित केला आहे. गावात त्याला रोजगार हमी योजना असे नाव दिले असून येणाऱ्या पुढील काळात वर्षभरात १०० मजूरांना काम देण्याचा संकल्प केला आहे. या प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव सुभाष हिरबा निशाने (३९) रा. रेंगेपार असे आहे.सध्या सुभाष याने चार एकरात स्वत:च्या शेतीत भेंडीचे लागवड ३ डिसेंबर २०१५ ला केली होती. भेंडीचा प्रथम तोडा १० फेब्रुवारी २०१६ ला निघाला. प्रथम तोड्यात अडीच क्विंटल भेंडी निघाली. एक दिवसाआड १५ क्विंटल भेंडीचे उत्पादन निघत असून एका आठवड्यात ४५ क्विंटल भेंडी उत्पादन होते. सध्या भेंडीचा प्रति किलो २० ते २२ रुपये आहे.सहा पुरुष मजूर व ४१ महिला मजूर सुभाषकडे कामाला जातात. पुरुषाला प्रति दिवस २०० रुपये मजुरी तर महिलांना चार तासांचे ६० रुपये मजूरी दिली जाते. एका आठवड्यात ९० हजारांची भेंडी विक्री केली जाते. आतापर्यंत भेंडीचे २६ ते २७ तोडे झाले आहे. भेंडीचे पीक तीन महिने घेता येते. सुभाषने १,५७३ जे.के. जातीचे १४ किलो ग्रॅम भेंडीचे बियाणे ४५ हजार रुपयात खरेदी केले. एप्रिल महिन्यापर्यंत भेंडीचे उत्पादन घेतल्या जाणार आहे.एका आठवड्यातून दोनदा भेंडीला पाणी दयावे लागते. सुभाष ७० ते ८० हजार खतावर खर्च करावा लागला. भेंडी विक्री करिता गोंदिया येथील बाजारपेठेत नेली जाते. भेंडी रुचकर असल्याने गोंदिया बाजारपेठेत ही भेंडीला मोठी मागणी आहे.१० एप्रिलपर्यंत दुसरे काकडीची शेती ५ एकरात सुभाष लागवड करणार आहे. याकरिता ४० हजारांचा खर्च अपेक्षीत आहे. मे महिन्यापर्यंत काकडीचे उत्पादन घेता येणार आहे. यातून अडीच ते ३ लाखांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. वांगी, भेंडी व नंतर काकडी शेत पिकावर ४० मजूर तर ऊस लागवडीवर ५० मजूर असे ९० मजूर १० महिने सुभाषकडे कामे करतात.सुभाषकडे स्वत:ची १२ एकर शेती असून ३४ एकर शेती तो भाड्याने वर्षभर करतो. गावात रोजगार नाही. रोजगाराकरिता मजूर गाव सोडून पलायन करतात. गावातच १२ महिने रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता शासनावर अवलंबूनन राहता रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प सुभाष याने केला आहे. शासन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वर्षातून ९० दिवस कामे उपलब्ध करुन देते, सुभाष त्याही पलीकडे जाऊन विचार करीत आहे.हेवा वाटावा असे काम शेती परवडत नसतांनी सुभाषने हाती घेतले व त्यात तो यशस्वी होत आहे. कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेचा तो सदस्य आहे. पंरतु प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र कृषी विभागाचे अधिकारी भेट देत नाही ही खरी शोकांतीका आहे. सुभाष यांची मजूरांप्रती तमळळ वाख्याण्यासारखी आहे, पंरतु भरघोष शेती उत्पादन घेण्याकरिता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर भेट देऊन आधूनिक पध्दतीने पीक कसे घेता येईल याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- हिरालाल नागपुरे, गटनेता, पंचायत समिती, तुमसर