शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ...

ठळक मुद्देधान्याचा लाभ : भंडारा जिल्ह्यात दोन लाख पाच हजार शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना होत असून दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमुळे तिहेरी शिधापत्रिका पध्दत संपुष्ठात आली. प्राधान्य कुटूंब योजना लागू झाली. यामध्ये दारिद्रय रेषेखालील १०० टक्के लाभार्थी, तसेच केशरी शिधापत्रिकेमधील ग्रामीण क्षेत्राकरिता ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न व शहरी क्षेत्रातील ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.भंडारा जिल्ह्यात एकूण सात लाख ११ हजार ६५ लाभार्थ्यांची निवड करून प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. तसेच अंत्योदय योजनेच्या ६४ हजार ५८५ शिधापत्रिकामधील दोन लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रति कार्ड ३५ किलो अन्नधान्य दिले जात आहे. दोन्ही योजनेत जिल्ह्यातील एकुण दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकेवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.सदर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये भंडारा तालुका ४१ हजार ५२४ शिधापत्रिका, १ लाख ९६ हजार ३६३ लाभार्थी. मोहाडी २९ हजार ९३ शिधापत्रिका, एक लाख ४० हजार ९२१ लाभार्थी. तुमसर ४२ हजार १३६ शिधापत्रिका, दोन लाख १० हजार २१७ लाभार्थी, लाखनी २२ हजार ५६९ शिधापत्रिका धारक आहेत.एक लाख ११ हजार ५६० लाभार्थी. साकोली २१ हजार ८०८ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ५६० लाभार्थी. पवनी २६ हजार ७५ शिधापत्रिका, एक लाख ३० हजार ९८५ लाभार्थी. लाखांदूर २२ हजार २२३ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ६५२ लाभार्थी असे दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकांवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.४१ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी पाठपुरावाराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे पाठपुरावा सुरु आहे. शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतीक्षेत असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्यात येईल.