शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ...

ठळक मुद्देधान्याचा लाभ : भंडारा जिल्ह्यात दोन लाख पाच हजार शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना होत असून दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात आहे. या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप होत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमुळे तिहेरी शिधापत्रिका पध्दत संपुष्ठात आली. प्राधान्य कुटूंब योजना लागू झाली. यामध्ये दारिद्रय रेषेखालील १०० टक्के लाभार्थी, तसेच केशरी शिधापत्रिकेमधील ग्रामीण क्षेत्राकरिता ४४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न व शहरी क्षेत्रातील ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे.भंडारा जिल्ह्यात एकूण सात लाख ११ हजार ६५ लाभार्थ्यांची निवड करून प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. तसेच अंत्योदय योजनेच्या ६४ हजार ५८५ शिधापत्रिकामधील दोन लाख ९४ हजार २८३ लाभार्थ्यांना प्रति कार्ड ३५ किलो अन्नधान्य दिले जात आहे. दोन्ही योजनेत जिल्ह्यातील एकुण दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकेवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.सदर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये भंडारा तालुका ४१ हजार ५२४ शिधापत्रिका, १ लाख ९६ हजार ३६३ लाभार्थी. मोहाडी २९ हजार ९३ शिधापत्रिका, एक लाख ४० हजार ९२१ लाभार्थी. तुमसर ४२ हजार १३६ शिधापत्रिका, दोन लाख १० हजार २१७ लाभार्थी, लाखनी २२ हजार ५६९ शिधापत्रिका धारक आहेत.एक लाख ११ हजार ५६० लाभार्थी. साकोली २१ हजार ८०८ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ५६० लाभार्थी. पवनी २६ हजार ७५ शिधापत्रिका, एक लाख ३० हजार ९८५ लाभार्थी. लाखांदूर २२ हजार २२३ शिधापत्रिका, एक लाख ७ हजार ६५२ लाभार्थी असे दोन लाख पाच हजार ७६१ शिधापत्रिकांवरील १० लाख पाच हजार ३४८ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.४१ हजार शिधापत्रिकाधारकांसाठी पाठपुरावाराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पुरवठा विभागातर्फे पाठपुरावा सुरु आहे. शासनास वाढीव इष्टांकाची मागणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर वाढीव इष्टांक प्राप्त होताच प्रतीक्षेत असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्यात येईल.