शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल काय?’, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

भंडारा : हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात मान्सून वेळेवर दाखलही झालाही. मात्र, गत काही दिवसांपासून ...

भंडारा : हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात मान्सून वेळेवर दाखलही झालाही. मात्र, गत काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने बळीराजाला पावसाची चिंता सतावत आहे. त्यातच वाढत चाललेले तापमान आणि पावसाचा खंड यामुळे बळीराजा धास्तावला आहे. साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साेयाबीनचे पेरणी केली आहे. पिके वाढीस लागली आहेत. मात्र, काही कारणास्तव काही जणांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली आहे. अनेकांनी धानाची नर्सरी टाकली आहे. सातत्याने पाऊस काेसळत नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अद्यापतरी जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवलेली नाही. मात्र, राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अद्यापही पावसाने उघाड दिली असल्याने तेथे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय आहे, अशा शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अपेक्षित पाऊस न पडल्यास यावर्षीही धान राेवणीला विलंब हाेण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धानाचे पऱ्हे लागवडी याेग्य झाले असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणू लागले आहेत.

बॉक्स

साेयाबीनचा पेरा घटला

जिल्ह्यात प्रमुख धान पीक हे पीक असले तरी आजही जिल्ह्यात साेयाबीन, तूर, कापूस काही प्रमाणात घेतला जाताे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, माेहाडी तालुक्यांत अनेक शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात जिल्ह्यात ५०० हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र घटले असून, भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यासाेबतच तूर, भाजीपाला पिकाचीही लागवड केली असून, आता पाऊस कधी पडतो याची चिंता बळीराजाला लागली आहे.

बॉक्स

४ जुलैपर्यंत २,०८८.९ पाऊस

जिल्ह्यात कडधान्य पिकाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. भातपिकाला जुलै महिना ते १,७७०.५ इतका अपेक्षित पाऊस हाेता. मात्र, त्या तुलनेत ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २,०८८.९ इतका प्रत्यक्षात पाऊस झाला असल्याने अजूनतरी दुबार पेरणीची वेळ आलेली नाही. अधूनमधून काेसळत असलेला पाऊस लक्षात घेता शेतशिवारातील धानाचे पऱ्हे लागवडीयाेग्य झाले आहेत.

काेट

देव अशी परीक्षा का घेताे...

अन्नदात्याला दरवर्षीच विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्ग काेपला आहे. कधी महापूर तर कधी पावसाचा खंड, कधी पीक चांगले आलेच, तर कधी कीडराेगाचे आक्रमण हाेते. बळीराजाची देव अशी परीक्षा का घेताे, असे शेतकरी म्हणतात. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहाेत. वृक्षलागवडीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा.

-तानाजी गायधने, शेतकरी

काेट

माझ्या बालपणी जून, जुलै महिन्यात धाे-धाे पाऊस पडायचा. मात्र, दिवसेंदिवस आता हे चित्र बदलत आहे. आता पाऊस नाही. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अति पर्जन्यवृष्टीने साेयाबीन, भाजीपाला पिकाचे अताेनात नुकसान हाेते. त्यामुळे निसर्गही बळीराजाची दरवर्षीच परीक्षा घेताे.

-मृणाल घाटाेळे, शेतकरी

काेट

गतवर्षी जिल्ह्यात ४ जुलै २०२० पर्यंत १,९२९.५ इतका पाऊस झाला हाेता. १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्हृयात सरासरी ९,३११.५ इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील धानपीक हे प्रमुख पीक आहे. अजून अनेकांची धानराेवणी व्हायची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ जुलैपर्यंत २,०८८.९ इतका पाऊस झाला आहे. भाजीपाला तूर, साेयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, अजूनतरी दुबार पेरणीचा धाेका नाही. सिंचनाची साेय असणारी शेतकरी राेवणी करीत आहे.

-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा