शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल काय?’, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

भंडारा : हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात मान्सून वेळेवर दाखलही झालाही. मात्र, गत काही दिवसांपासून ...

भंडारा : हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार राज्यात मान्सून वेळेवर दाखलही झालाही. मात्र, गत काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने बळीराजाला पावसाची चिंता सतावत आहे. त्यातच वाढत चाललेले तापमान आणि पावसाचा खंड यामुळे बळीराजा धास्तावला आहे. साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साेयाबीनचे पेरणी केली आहे. पिके वाढीस लागली आहेत. मात्र, काही कारणास्तव काही जणांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली आहे. अनेकांनी धानाची नर्सरी टाकली आहे. सातत्याने पाऊस काेसळत नसला तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्याने अद्यापतरी जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवलेली नाही. मात्र, राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अद्यापही पावसाने उघाड दिली असल्याने तेथे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची साेय आहे, अशा शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अपेक्षित पाऊस न पडल्यास यावर्षीही धान राेवणीला विलंब हाेण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धानाचे पऱ्हे लागवडी याेग्य झाले असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सांग सांग भाेलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणू लागले आहेत.

बॉक्स

साेयाबीनचा पेरा घटला

जिल्ह्यात प्रमुख धान पीक हे पीक असले तरी आजही जिल्ह्यात साेयाबीन, तूर, कापूस काही प्रमाणात घेतला जाताे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, माेहाडी तालुक्यांत अनेक शेतकरी साेयाबीनचे उत्पादन घेतात जिल्ह्यात ५०० हेक्टरवर साेयाबीनची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचे क्षेत्र घटले असून, भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. यासाेबतच तूर, भाजीपाला पिकाचीही लागवड केली असून, आता पाऊस कधी पडतो याची चिंता बळीराजाला लागली आहे.

बॉक्स

४ जुलैपर्यंत २,०८८.९ पाऊस

जिल्ह्यात कडधान्य पिकाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. भातपिकाला जुलै महिना ते १,७७०.५ इतका अपेक्षित पाऊस हाेता. मात्र, त्या तुलनेत ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात २,०८८.९ इतका प्रत्यक्षात पाऊस झाला असल्याने अजूनतरी दुबार पेरणीची वेळ आलेली नाही. अधूनमधून काेसळत असलेला पाऊस लक्षात घेता शेतशिवारातील धानाचे पऱ्हे लागवडीयाेग्य झाले आहेत.

काेट

देव अशी परीक्षा का घेताे...

अन्नदात्याला दरवर्षीच विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्ग काेपला आहे. कधी महापूर तर कधी पावसाचा खंड, कधी पीक चांगले आलेच, तर कधी कीडराेगाचे आक्रमण हाेते. बळीराजाची देव अशी परीक्षा का घेताे, असे शेतकरी म्हणतात. मात्र, पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहाेत. वृक्षलागवडीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा.

-तानाजी गायधने, शेतकरी

काेट

माझ्या बालपणी जून, जुलै महिन्यात धाे-धाे पाऊस पडायचा. मात्र, दिवसेंदिवस आता हे चित्र बदलत आहे. आता पाऊस नाही. मात्र ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अति पर्जन्यवृष्टीने साेयाबीन, भाजीपाला पिकाचे अताेनात नुकसान हाेते. त्यामुळे निसर्गही बळीराजाची दरवर्षीच परीक्षा घेताे.

-मृणाल घाटाेळे, शेतकरी

काेट

गतवर्षी जिल्ह्यात ४ जुलै २०२० पर्यंत १,९२९.५ इतका पाऊस झाला हाेता. १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्हृयात सरासरी ९,३११.५ इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील धानपीक हे प्रमुख पीक आहे. अजून अनेकांची धानराेवणी व्हायची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ जुलैपर्यंत २,०८८.९ इतका पाऊस झाला आहे. भाजीपाला तूर, साेयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, अजूनतरी दुबार पेरणीचा धाेका नाही. सिंचनाची साेय असणारी शेतकरी राेवणी करीत आहे.

-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा