शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:13 IST

राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देरोपे आपल्या दारी योजना : नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या महत्वांकाक्षी ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. या अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५४ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.रोपे उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने ‘रोपे आपल्या दारी’ ही योजना आणली असून १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणार आहेत.या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपवनसरंक्षकांनी केले आहे. वनविभाग, सामाजिक वनविकास महामंडळ, राज्य व केंद्र शासनाचे इतर विभाग सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे. हा केवळ शासनाचा उपक्रम न राहता ही लोकचळवळ व्हावी व हे ईश्वरीय कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांना यात सहभागी होता व्हावे म्हणून हरित सेना अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.शासनाच्या रोपे आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी तसेच वनविभाग व सामाजिक वनीकरण मधील रोपवाटिकेत रोपे विक्रीकरीता स्टॉल लावण्यात आलेले आहेत.रोपवाटिकेत आंबा, गुलमोहर, पेल्टोफोरम, सप्तपर्णा आवळा, चिंच, जांभूळ, अमलतास, कॅशिया, निलगीरी, कडुनिंब, बकेन, सिताफळ, करंज, वड, शेवगा, मोहा, कवट, बेहडा, हिरडा, पिंपळ, बांबु, साग, शिवन, रेनट्रो, शिसू आदी प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत. शासनामार्फत वनमहोत्सव सदर रोपे १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराप्रमाणे स्टॉलवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर ‘ रोपे आपल्या दारी’ योजनेचा लाभ घेवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असे आवाहन उपवनसरंक्षक विवेक होशिंग यांनी केले आहे.