शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

तूर डाळीचे दर अद्याप कडाडलेलेच

By admin | Updated: November 29, 2015 01:33 IST

यावर्षीच्या हंगामात तुरीचे दर कडाडलेलेच आहे. त्यामुळे पुढीलवर्षीही डाळ महागण्याची शक्यता आहे.

लाखनी : यावर्षीच्या हंगामात तुरीचे दर कडाडलेलेच आहे. त्यामुळे पुढीलवर्षीही डाळ महागण्याची शक्यता आहे. यावर्षी आठ हजारांवर बाजार समितीत भाव आहे. सध्यास्थितीत किरकोळ बाजारात तूर डाळ १४० ते १८० रुपये या दराने विक्री सुरू आहे. सध्या शेतात तूर पीक आहे. तूर निघण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंत हे दर कायम राहतात, की नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांचा माल निघताच दर घसरतात, हे आताच सांगणे कठीण आहे. मागीलवर्षी तुरीला सरासरी ४ हजार रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता. मात्र यावर्षी सध्या या दरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुढीलवर्षीही तूर डाळ महागणार राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.मागीलवर्षीपेक्षा शेत मालाचे दर सरासरी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र तुरीचे दर दुप्पट झाले आहेत. तथापि सध्या शेतकऱ्यांकडे तूर नाही. विक्रीस आलेली तूर मागीलवर्षीची साठवून ठेवलेली, असावी असा कयास आहे. त्यामुळे दरवाढीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना न मिळता साठेबाजांनाच झाला असा, असा तर्क काढण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी) कारवाई नव्हे लूटचतूर डाळीच्या साठेबाजारीनंतर राज्य शासनाने साठेबाजांविरुद्ध धाडसत्र राबविले. जिल्ह्यात अन्न पुरवठा विभागाने भरारी पथक स्थापन करुन व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर छापे घातले. यासाठी पथकावर हजारो रूपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, कारवाईत एक किलोही डाळ सापडली नाही. कारवाईच्या नावावर मात्र अधिकाऱ्यांनी स्वत:ची ‘डाळ’ शिजविली.