शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

लिंकिंगची खते घ्या, अन्यथा पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

भंडारा : रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी परस्पर वाढविल्यानंतर शेतकरी व कृषी केंद्र संचालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. दुसरीकडे ...

भंडारा : रासायनिक खतांच्या किमती कंपन्यांनी परस्पर वाढविल्यानंतर शेतकरी व कृषी केंद्र संचालक यांच्यात वाद निर्माण होत आहेत. दुसरीकडे लिंकिंगची खते न घेतल्यास खतांचा पुरवठा बंद करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी देत आहे. याबाबत जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे निवेदन देत रासायनिक खतांची दरवाढ मागे घेण्यासोबतच लिंकिंगची सक्ती करू नये, अशी मागणी केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, मे महिन्यात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण पुढे करीत रासायनिक खते व इतर कंपन्यांनी खताची दरवाढ केली होती. त्यामुळे एक खताच्या गोणीमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. २० मेपासून कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खताच्या कमी झालेल्या दराचे अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले होते. कंपनीनिहाय आणि ग्रेडनिहाय रासायनिक खतांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र महिनाभराच्या आतच रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी खताच्या भावात वाढ केली. एका इंटरनॅशनल कंपनीने आपल्या कमाल विक्रीच्या किमतीमध्ये दरवाढ केली आली आहे. त्यामुळे आधी १०५० जाहीर केलेली किंमत आता या खताची विक्री ११२५ रुपये या दराने केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला कृषी केंद्र संचालकांना तोंड द्यावे लागत आहे.

एकीकडे शासनाने सर्व कंपन्यांना रासायनिक खतांचे दर ठरवून दिले असताना कंपन्या परस्पररित्या खताचे भाव वाढवित आहे. तसेच या रासायनिक खतासोबत लिंकिंगचे खते घ्यावीत, अशी सक्तीही करीत आहेत. लिंकिंगचे खत न घेतल्यास मालाचा पुरवठा करणार नाही, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे जिल्हा ऍग्रो डीलर असोसिएशनचे म्हणने आहे. यामुळे जिल्ह्यातील खत विकणाऱ्या डीलरांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. रासायनिक खत पुरवठा कंपन्यांची मुजोरी वाढत असल्याचेही ॲग्रो डीलर असोसिएशनने म्हटले आहे. यासंदर्भात असोसिएशनने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करीत रासायनिक खतांची दरवाढ रोखण्याबाबत व लिंकिंग खताची सक्ती होऊ नये यासाठी कारवाईची मागणी केली आहे.

बॉक्स

बळीराजाला आर्थिक भुर्दंड

महिन्याभरातच रासायनिक खत विकणाऱ्या कंपन्यांनी खतांच्या भावात वाढ केली. याचा सरळसरळ फटका बळीराजाला पडत आहे. कृषी केंद्र संचालकही अडचणीत आल्याने त्यांना बळीराजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे सरकारने खताचे दर ठरवून दिले असतानाही रासायनिक खत विकणाऱ्या कंपन्यांची ही मुजोरी शेतकऱ्यांनी सहन करावी काय?, आम्ही अधिकचे पैसे का बरं द्यावे असा प्रश्नही शेतकरी विचारत आहे.