शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सुरबोडी पुनर्वसानाचा प्रश्न अधांतरी

By admin | Updated: January 19, 2017 00:25 IST

पवनी तालुक्यातील सुरबोडी पुनर्वसनाचा प्रश्न सन २०१२ पासून शासन दरबारी रखडलेला आहे.

गावाला बेटाचे स्वरुप : ७५ टक्के गावात आदिवासींचे वास्तव्यचिचाळ : पवनी तालुक्यातील सुरबोडी पुनर्वसनाचा प्रश्न सन २०१२ पासून शासन दरबारी रखडलेला आहे. पावसाळ्यात वैनगंगेला येणाऱ्या पुरामुळे व धरणाचे पाणी अडविल्याने संपूर्ण सूरबोडीला बेटाचे स्वरुप येते. पुनर्वसन झाले नसल्याने धरणाच्या पाण्यामुळे विविध आजाराची लागण होऊन गाव वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाचे अधिकारी दरवर्षी गावाला भेट देवून मुल्यांकन करतात. मात्र, त्यानंतर कारवाई शुन्य आहे. मात्र पाणी कुठे मुरते हे अद्यापही न समजणारे कोडे आहे. पुनर्वसनाची कोणतीच प्रक्रिया दिसून येत नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.पवनी तालुक्यापासून ३१ कि.मी. अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या गट ग्रामपंचायत सौंदड मध्ये समाविष्ट आहे. या ग्रामपंचायतमध्ये सुरबोडी, खापरी या गावाचा समावेश आहे. सौंदड व खापरी या गावाचे चकारा येथे पुनर्वसन झाले आहे.मात्र सुरबोडी हे एकटेच गाव नदीशेजारी राहिले आहे. सुरबोडी गाव हे गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. या गावाची ३६४ लोकसंख्या व ९० कुटुंब आहेत. ६७ शेतकरी व २३ भूमिहीन कुटुंब आहेत. गावामध्ये ७५ टक्के आदिवासी, गोंड, ढिवर, माळी, लोहार समाजाचे वास्तव्य आहे.गावातील ४१.५३ शेती आहे. यापैकी ३८.४० हेक्टर आर शेतजमीन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आली आहे. ९२.४६ टक्के असून ७५ टक्के पेक्षा अधिक आहे. उर्वरीत ४६.७६ हेक्टर आर शेतजमीन मौजा सौंदड खापरी चकारा येथील शेतकऱ्यांची आहे.गोसेखुर्द पुनर्वसन विभाग आंबाडी सुरबोडी फेरसर्व्हेक्षण नुसार गावाचे उत्तरेकडील बाजूला धरणाचे बुडीत क्षेत्राचे पाणी ५० मिटरपर्यंत येईल. पूर्वेस १२५ मी. अंतर पर्यंत व पश्चिमेस ३५० मि. अंतरावर येणार असल्याचे नमूद आहे. गावाच्या दक्षिणेस झुडपी जंगल आहे. सध्या धरणाचे पाणी १.५०० कि.मी. अंतरावर आहे.शासनाने धरणाचे पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने शासनाच्या मुल्यांकनानुसार केव्हाही पाणी गावाला वेढा घेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे अथांग पाणी भूअंतर्गत पाण्यात झिरपून गावातील पाण्याचे स्त्रोत विहिरी, कुपनलिका दूषित होऊन आरोग्याला, चर्मरोग, पोटाचे विकार, दमा, खासी, डेंग्यू, कावीळ निर्माण होण्याची शक्यता आहे. गावाच्या चारही बाजंूनी दलदलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डास व किटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, साथीचे रोग या सोबतच वन्यप्राण्यांचा धोका संभवत आहे. धरणाच्या जलाशयासाठी शेतजमीन बाधीत झाल्याने रोजगाराचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गावातील लोकांना भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सूरबोडी गावाचे पुनर्वसन करून पुनर्वसन अनुदान, घरबांधणी अनुदान, नोकरी ऐवजी मिळणारी एकमुस्त रकमेसह मिळणारे सर्व लाभ द्यावे, धरणाच्या जलाशयात व मासेमारीचा कायमस्वरुपी लाभ द्यावा, आदी समस्यांचे निवेदन विभागीय आयुक्त पुनर्वसन नागपूर, आमदार रामचंद्र अवसरे व जिल्हाधिकारी भंडारा यांना ग्रामस्थांनी दिला आहे. गावाला पूनर्वसन योजनेंतर्गत लाभ देऊन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी या निवेदनातून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. (वार्ताहर)