शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सुरबोडी पुनर्वसानाचा प्रश्न अधांतरी

By admin | Updated: January 19, 2017 00:25 IST

पवनी तालुक्यातील सुरबोडी पुनर्वसनाचा प्रश्न सन २०१२ पासून शासन दरबारी रखडलेला आहे.

गावाला बेटाचे स्वरुप : ७५ टक्के गावात आदिवासींचे वास्तव्यचिचाळ : पवनी तालुक्यातील सुरबोडी पुनर्वसनाचा प्रश्न सन २०१२ पासून शासन दरबारी रखडलेला आहे. पावसाळ्यात वैनगंगेला येणाऱ्या पुरामुळे व धरणाचे पाणी अडविल्याने संपूर्ण सूरबोडीला बेटाचे स्वरुप येते. पुनर्वसन झाले नसल्याने धरणाच्या पाण्यामुळे विविध आजाराची लागण होऊन गाव वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. प्रशासनाचे अधिकारी दरवर्षी गावाला भेट देवून मुल्यांकन करतात. मात्र, त्यानंतर कारवाई शुन्य आहे. मात्र पाणी कुठे मुरते हे अद्यापही न समजणारे कोडे आहे. पुनर्वसनाची कोणतीच प्रक्रिया दिसून येत नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.पवनी तालुक्यापासून ३१ कि.मी. अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या गट ग्रामपंचायत सौंदड मध्ये समाविष्ट आहे. या ग्रामपंचायतमध्ये सुरबोडी, खापरी या गावाचा समावेश आहे. सौंदड व खापरी या गावाचे चकारा येथे पुनर्वसन झाले आहे.मात्र सुरबोडी हे एकटेच गाव नदीशेजारी राहिले आहे. सुरबोडी गाव हे गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. या गावाची ३६४ लोकसंख्या व ९० कुटुंब आहेत. ६७ शेतकरी व २३ भूमिहीन कुटुंब आहेत. गावामध्ये ७५ टक्के आदिवासी, गोंड, ढिवर, माळी, लोहार समाजाचे वास्तव्य आहे.गावातील ४१.५३ शेती आहे. यापैकी ३८.४० हेक्टर आर शेतजमीन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आली आहे. ९२.४६ टक्के असून ७५ टक्के पेक्षा अधिक आहे. उर्वरीत ४६.७६ हेक्टर आर शेतजमीन मौजा सौंदड खापरी चकारा येथील शेतकऱ्यांची आहे.गोसेखुर्द पुनर्वसन विभाग आंबाडी सुरबोडी फेरसर्व्हेक्षण नुसार गावाचे उत्तरेकडील बाजूला धरणाचे बुडीत क्षेत्राचे पाणी ५० मिटरपर्यंत येईल. पूर्वेस १२५ मी. अंतर पर्यंत व पश्चिमेस ३५० मि. अंतरावर येणार असल्याचे नमूद आहे. गावाच्या दक्षिणेस झुडपी जंगल आहे. सध्या धरणाचे पाणी १.५०० कि.मी. अंतरावर आहे.शासनाने धरणाचे पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने शासनाच्या मुल्यांकनानुसार केव्हाही पाणी गावाला वेढा घेण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे अथांग पाणी भूअंतर्गत पाण्यात झिरपून गावातील पाण्याचे स्त्रोत विहिरी, कुपनलिका दूषित होऊन आरोग्याला, चर्मरोग, पोटाचे विकार, दमा, खासी, डेंग्यू, कावीळ निर्माण होण्याची शक्यता आहे. गावाच्या चारही बाजंूनी दलदलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डास व किटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग, साथीचे रोग या सोबतच वन्यप्राण्यांचा धोका संभवत आहे. धरणाच्या जलाशयासाठी शेतजमीन बाधीत झाल्याने रोजगाराचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गावातील लोकांना भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सूरबोडी गावाचे पुनर्वसन करून पुनर्वसन अनुदान, घरबांधणी अनुदान, नोकरी ऐवजी मिळणारी एकमुस्त रकमेसह मिळणारे सर्व लाभ द्यावे, धरणाच्या जलाशयात व मासेमारीचा कायमस्वरुपी लाभ द्यावा, आदी समस्यांचे निवेदन विभागीय आयुक्त पुनर्वसन नागपूर, आमदार रामचंद्र अवसरे व जिल्हाधिकारी भंडारा यांना ग्रामस्थांनी दिला आहे. गावाला पूनर्वसन योजनेंतर्गत लाभ देऊन ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी या निवेदनातून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. (वार्ताहर)