शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

उन्हाच्या झळा, अघोषित संचारबंदी

By admin | Updated: June 2, 2014 00:25 IST

सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला भंडार्‍यात उष्णतेने फिरणे असह्य केले.

भंडारा

दरवर्षीच

उष्ण

मागील

उष्णतेच्या

आज

रस्ते

मे

आरोग्य यंत्रणा सज्ज उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. उष्णतेपासून उष्माघाताची शक्यता असते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सूर्य आग ओकु लागला आहे. या महिन्यात पारा ४६ अंशापर्यंत पोहचला. उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर म्हणाले, यावर्षी रुग्णालयात उष्माघाताचा रुग्ण दाखल झालेले नाही. परंतु वातावरणाच्या बदलामुळे इतर आजारांचे रुग्ण दाखल झाले आहे. उष्माघाताच्या उपचारासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. उपचारासाठी औषधाचा मुबलक साठा आहे. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांसह परिचारिका तैनात आहेत. या कक्षात रुग्णांना गारवा मिळावा, यासाठी कक्ष वातानुकुलीत करण्यात आले आहे.

कडक

झाले निर्मनुष्य महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णतेत वाढ झाली. दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि जिल्ह्यात असलेले राज्यमार्ग निर्मनुष्य असल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरातील रस्त्यांवर दुपारच्या सुमारास वाहनांची वर्दळ कमी दिसून येते. ग्रामीण भागात देखील शेतीची कामे तसेच इतर कामे सकाळी व संध्याकाळीच आटोपण्यात येत आहेत. उन्हामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ नये याची खबरदारी घेण्याचा सल्ला वडीलधारी मंडळी युवकांना देत आहेत. शहरात दिवसभर उन्हाच्या झळा लागत असल्याने शहर अघोषित संचारबंदीप्रमाणे दिसून येत आहे.अनेक नागरिक झाडाचा आसरा घेताना आढळून येतात. कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पार्‍यात अधीक वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कडक उन्हाळ्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसा छत्री घेऊन नागरिक उन्हात दिसून येतात. उष्माघाताच्या बचावासाठी बहुतांश नागरिकांच्या खिशात कांदा दिसून येतो. उष्णतेत कमालीची वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत आहेत. यावर्षीचा उन्हाळा जीवघेणा ठरत दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. वाहतूक ठप्प होत असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. दुपारी फेरीवाले फिरताना दिसत नाहीत. नागरिकांचीही वर्दळ नसते. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरु आहे. बसेसमध्ये गर्दी कमी दिसू लागलेली आहे. सूर्य प्रखरतेने तापत आहे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. सर्वत्र वाढत्या तापमानाचा विपरीत परिणाम जाणवत आहे. वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी क्षणभर का होईना नागरिक थंड अशा निसर्गरम्य स्थळी संबंध दिवस घालवतांनी दिसून येत आहेत. कालप्रवाहात तापमानापासून संरक्षीत ठेवण्यासाठी कुलर, पंखे, एसी आदी इलेक्ट्रीक साधने उपलब्ध झालीत. दिवसागणिक वाढत जाणारे तापमान असह्य होत आहे. जिल्ह्यातील आबाल-वृद्ध रखरखत्या उन्हात जिथे गारवा मिळते तिकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. सूर्याची आग नागरिकांना भयभीत करीत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विद्युत भारनियमन आहे. सर्वसामान्य जनतेला महागडे इलेक्ट्रीक साधने विकत घेणे अवघड आहे. शीत हवा देणारे इलेक्ट्रिक साधने यामुळे वीज मोठय़ा प्रमाणात जळते. सर्वत्र संगणकीय मीटर लावले असल्याने विज चोरीला आळा बसलेला आहे. वीज चोरी होत नसली तरी विजेची जळण मोठय़ा प्रमाणात होते. परिणामी विद्युत बिलातील आकडे फुगलेले दिसतात. ते सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. कृत्रिम साधनांपेक्षा फुकटचे नैसर्गिक स्त्रोत प्रत्येकाला स्वागतार्ह वाटतात. अलिकडे वाढत्या भयावह अशा तापमानात गारव्याची सुखद प्रचिती घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दीत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. या निसर्गरम्य स्थळाचा आस्वाद घेण्यासाठी आबालवृद्ध येत असल्याचे दिसत आहेत. वनराईच्या सान्निध्यात ते संबंध दिवस घालवून वाढत्या तापमानावर मात करीत असल्याचे दिसत आहेत. वाढत्या तापमानाने सर्व सामान्यांचे जीवन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी) बचावासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती, शीतपेयांची दुकाने थाटलेली आहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननस आदींची विक्री वाढली आहे. आता ५0 रूपयांपासून १00 रूपयांपर्यत टरबुजची खरेदी केली जात आहे. १२ वर्षांमध्ये सर्वाधिक तापमान सन २00२ मध्ये ४३ अंश, २00३ मध्ये ४२ अंश, २00४ मध्ये ४२ अंश, २00५ मध्ये ४६ अंश, २00६ मध्ये ४२ अंश, २00७ मध्ये ४४.५ अंश, २00८ मध्ये ४२.५ अंश, २00९ मध्ये ४४.५, सन २0१0 मध्ये ४६ अंश, २0११ मध्ये ४६.५ अंश, सन २0१२ मध्ये ४६.५ अंश, सन २0१३ मध्ये ४६ अंश तर यावर्षी दि.३१ मे रोजी ४६ अंश तापमान नोंदविण्यात आले. वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पारा उच्चांक गाठतो. मागील १0 दिवसांपूर्वी ४0 ते ४२ अंशादरम्यान असलेले तापमान काल, शनिवारी ४६ अंशावर पोहोचले. आज, रविवारी ४४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. : सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला भंडार्‍यात उष्णतेने फिरणे असह्य केले. ही तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यावर्षीच्या हंगामातील उन्हाच्या सर्वाधिक झळा चार दिवसांपासून जाणवत आहेत. त्यामुळे शहरात दिवसभर अघोषित संचारबंदीचे चित्र पहावयास मिळते.