शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

साखरेपासून गाठ्या निर्मितीला आला वेग

By admin | Updated: March 1, 2015 00:37 IST

होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

पवनी : होळी व रंगपंचमीचा सण जवळ येताच साखरेपासून निर्मिती करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. यावर्षी साखर काही प्रमाणात स्वस्त झाल्याने गाठ्याही स्वस्त राहणार आहेत.राज्यामध्ये होळी व धूलिवंदन सणानिमित्त आपल्या नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मिती केलेल्या गोड गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. ती आजही सुरू आहे. शहरातील घोडेघाट वॉर्डातील रविंद्र शिवरकर हे मागील १३ वर्षापासून गाठ्या निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी कविता व घरचे मुलेही मदत करतात.गाठ्या निर्मिती करीता मोठ्या पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठ्या भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घत्तलून विविध प्रकारच्या गाठ्यांची निर्मिती केली जाते. या गाठ्या निर्मिती करण्याकरीता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागिरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. यांना एक क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी दिल्या जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठ्यांची निर्मिती केली जाते. याचे त्यांना ८०० रूपये मिळतात. एक क्विंटल साखरेचा ९५ किलो गाठ्यांची निर्मिती होते. या गाठ्या २५, ५०, १००, २००, ५०० व १००० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.यावर्षी काही प्रमाणात साखर स्वस्त झाल्यामुळे गाठ्या सध्या स्वस्त राहणार आहेत. पण रंगपंचमीपर्यंत भाव चढणार आहे. रवींद्र शिवरकर यांनी ६ फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या गाठ्यांचे उत्पादन आतापर्यंत ५० क्विंटल पर्यंत गेलेले आहे. यावर्षी ७० क्विंटलपर्यंत गाठ्या निर्मिती होणे अपेक्षित आहे. (शहर प्रतिनिधी)