शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

सनफ्लॅग कंपनीच्या संपाचा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणाऱ्या सनफ्लॅग कंपनीने मागील दोन वर्षांत सर्वाधिक उत्पादन केले आहे. कोरोना संकटाची पार्श्‍वभूमी ...

भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणाऱ्या सनफ्लॅग कंपनीने मागील दोन वर्षांत सर्वाधिक उत्पादन केले आहे. कोरोना संकटाची पार्श्‍वभूमी असूनसुद्धा सुमारे दोन हजार कामगार अहोरात्र काम करीत होते. कंपनी उत्तम स्थितीत सुरू असताना देखील कोरोनाचे कारण देऊन ९०० कामगारांना कामावरून अचानक कमी करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासंबंधी योग्य उपाययोजना नसल्याने नजीकच्या ग्रामपंचायतने व असंख्य नागरिकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, यासंबंधी कुठलीही कार्यवाही कंपनीने केली नाही. कंपनीत अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कामगारांना अपघातांना सामोरे जावे लागते व अपंगत्व येते. कामगारांचे मृत्यूसुद्धा झाले आहेत. २०१७ पासून करारबद्ध असलेली वेतनवाढ बेकायदेशीररीत्या रोखून ठेवणे, यामुळे कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाची सखोल चौकशी होणे कामगारांच्या व विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी या मागणीत नमूद केले आहे.