शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
3
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
4
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
5
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
6
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
7
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
8
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
9
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
10
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
11
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
12
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
13
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
14
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
15
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
16
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
18
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
19
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
20
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस

काविळने धास्तावलेले विद्यार्थी गावाकडे परतले

By admin | Updated: August 12, 2014 23:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.

वसतिगृह झाले रिकामे : उपकरणांवर साचली धूळ तुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील ३५ विद्यार्थ्यांना काविळची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वच विद्यार्थी आपआपल्या गावाकडे रवाना झाले आहेत. सध्या वसतीगृहात एकही विद्यार्थी नाही. दरम्यान, या वसतीगृहाला भेट दिली असता तेथील उपकरणे बंद स्थितीत दिसून आले. पाणी शुद्धीकरण संयंत्र बंद होते. परिणामी दूषित पाणी सेवन केल्यामुळे त्यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. शहरातील गोवर्धन नगरात भाड्याच्या इमारतीत हे मुलांचे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ आहे. शैक्षणिक सत्र सुरू होवून दीड महिना झाला तरी येथे ३९ विद्यार्थी आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्याकरीता शासनाने नानाविध सुविधा पुरविल्या आहेत. यात संगणक, खेळांचे साहित्य, सफाई यंत्र, शुद्धीकरण यंत्राचा समावेश आहे. रॉकेलवर चालणारे जनरेटरसुद्धा वसतिगृहात उपलब्ध आहे. यासर्व वस्तु सध्या बंद अवस्थेत आहेत. केवळ कागदोपत्री सुरू आहेत. या वस्तुंचा वापर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेला नाही, हे येथे विशेष. जलशुद्धीकरण संयंत्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत होते. अशुद्ध पाण्यामुळेच त्यांना कावीळ आजाराने ग्रासले. येथील संगणक कापडाने झाकलेले आहे. विद्यार्थी संगणक व्यवस्थित हाताळत नाही, असे सांगण्यात येते. येथील धुळ साफ करणाऱ्या यंत्रावरच धुळ साचलेली दिसून आली. जनरेटर एका कोपऱ्यात बंदस्थितीत पडून होता. अद्याप त्याची तारेने जोडणी करण्यात आलेली नाही. हा जनरेटर आतापर्यंत सुरू करण्यात आला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला येथील गृहपाल जबाबदार आहे. कनिष्ठ लिपिकाला येथे पदोन्नती दिली आहे. अतिरिक्त प्रभार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)