लाखनी : स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शनाअभावी भरकटत चाललेल्या आजच्या विद्यार्थ्यांंना योग्य मार्गदर्शनाची गरज असून विद्यार्थ्यांंनीही विद्यार्थ्यांंचे खरे दिपस्तंभ कोण, याचा विचार करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा मनाशी बाळगुण अभ्यासू वृत्तीला चालना दिल्यास विद्यार्थी हा सक्षमपणे शैक्षणिक आवाहनांचा मुकाबला करू शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांंंनी अभ्यासवृत्ती जोपासणे आज काळाची गरज झाल्याचे प्रतिपादन त्रिरत्न बुद्ध विहार पालांदूर चौ. येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.युवराज खोब्रागडे यांनी वरील विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांंचे दिपस्तंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आधारित मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांंंची निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, आयोजित करण्यात आली होती. या मार्गदर्शन मेळाव्यात प्रा.युवराज खोब्रागडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दाखविलेली दिशा या विषयावर सखोल मार्गदर्शन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी प्रेम, शिक्षणाची आवड आदी बाबींवर प्रकाश टाकून त्यांची उच्च विद्येची लालसा व प्रभावी व्यक्तीमत्व यावरही योग्य मार्गदर्शन केले. प्रस्तुत प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं.स. सभापती दिलवर रामटेके हे होते. विशेष अतिथी पुज्य भन्ते काश्यप, प्रमुख मार्गदर्शक प्रा.नितीन थुल, युवराज खोब्रागडे आदी होते. याप्रसंगी नितीन थुल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून समाजासाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच आजच्या पिढीसाठी व येणार्या पिढय़ांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत, अशा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे संचालन हरिश्चंद्र लाडे यांनी कले तर आभार साखरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सहसचिव फुल्लूके, उपाध्यक्ष अनिता नंदागवळी, सचिव साखरे, सांस्कृतिक प्रमुख चंदा लाडे आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांंनी अभ्याससृष्टी जोपासावी
By admin | Updated: May 24, 2014 23:24 IST