शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

समुपदेशन चाचणीला विद्यार्थ्यांची दांडी

By admin | Updated: June 15, 2016 00:43 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण....

कलचाचणीचा उपयोग काय? : लक्ष्यांक उद्दिष्टाची जबाबदारी कुणावर?भंडारा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय, मार्गदर्शन व समुपदेशन अंतर्गत शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. निकालानंतर ६ ते १६ जून यादरम्यान या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समुपदेशन होत असून यात आतापर्यंत फक्त चार विद्यार्थ्यांचेच समुपदेशन झाले आहे.हजारोंच्या संख्येने परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त चार विद्यार्थ्यांचे समुपदेशन झाल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कलचाचणीचा कल निकालानंतर समुपदेशनाअभावी अपूर्ण राहिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची, पालकांची की शिक्षण विभागाची, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. ज्याप्रमाणे शासन निर्णय अंतर्गत कलचाचणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर समुपदेशन चाचणी अनिवार्य नसल्याने या चाचणीकडे विद्यार्थ्यांनी पाठ केली आहे. यावर्षीच्या १० वीच्या निकालात नागपूर विभागातून भंडारा जिल्हा चवथ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात दहावीच्या २८६ शाळा आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २०,३७४ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यात १०,२२६ मुले तर १००९५ मुलींनी परिक्षा दिली. यापैकी ८,३१६ मुले व ८,७५८ मुली उर्तीर्ण झाल्या. मात्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनांतर्गत विद्यार्थ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.या समुपदेशनात विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीसाठी मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना पुरेसा वाव मिळतो. राज्याच्या शैक्षणिक आकृतिबंध विचारात घेता प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक क्षेत्रांची व व्यवसायांची माहिती या समुपदेशनातून दिली जात असते. विद्यार्थ्यांना स्वत:चा कुटुंबाबरोबरच भारतीय समाज रचनेचा एक जबाबदार व सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी पालक आणि शाळेची आहे. त्याकरीता विद्यार्थ्यांना अनुरूप मार्गदर्शन व सहाय्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विविध शैक्षणिक क्षेत्रासंबंधात मार्गदर्शन व समुपदेशन करण्याची शासनाची रूपरेषा होती. परंतु कलचाचणी नंतर समुपदेशनाचा कार्यक्रम सपशेल फेल ठरला आहे.समुपदेशनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण महाविद्यालय (डी.एड.) येथे तीन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकडे वाढणारा कल लक्षात घेता त्यांना यासंदर्भात शास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असताना समुपदेशनाचे कार्य अधांतरी राहिले आहे. विशेष म्हणजे १० वीचा निकाल लागून नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही समुपदेशनासाठी विद्यार्थी गोळा होवू शकले नाही. याबाबत शिक्षण विभागावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचा कल चाचणीचा निकाल व प्रवेश प्रक्रिया यांचा कोणताही संबंध नसला तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाअंतर्गत समुपदेशन हा उपक्रम यशस्वी होवू शकलेला नाही. (प्रतिनिधी)