शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

संमेलनातून विचार प्रबोधनाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद मेश्राम होते.

ठळक मुद्देसुषमा भड : पवनी येथे परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अनेक साहित्यिकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : फुले, शाहू, आंबेडकर या थोरपुरुषांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ओबीसी महिला जागृत झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनआंदोलनाला वेगळा आयाम दिला. त्यांनी मानवतावादास प्राधान्य देऊन अनेकांना हादरे दिले. या परिवर्तन साहित्यामधून माणसे घडून विचार प्रबोधनाला बळ मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या अध्यक्षा सुषमा भड यांनी केले.परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद मेश्राम होते. यावेळी स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष पुनम काटेखायेच तर प्रमुख अतिथी म्हणून परिवर्तन विचार मंचचे अध्यक्ष विलास गजभिये, कार्याध्यक्ष शालीक जिल्हेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे पर्यटन विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद, भंदत ज्ञानबोधी थेरो, प्रा. भीमराव गायकवाड, पत्रकार मिलींद फुलझेले, मनोहर मेश्राम, पुनम हटवार आदी उपस्थित होते.साहित्यिकांचे ऐतिहासिक पवनी शहरात आगमन होताच वाजत गाजत गांधी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅली काढण्यात आली. रॅली संमेलनस्थळी पोहचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनेक साहित्यीकांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन सपत्नीक शाल, स्मृतीचिन्ह, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विलास गजभिये, पुनम काटेखाये, यांनी मार्गदर्शन केले. डॉ.प्रियदर्शी खोब्रागडे यांनी पवनीतील प्राचीन बौद्धस्तुपावर मार्गदर्शन केले.संमेलनाचे अध्यक्ष प्रा.विनोद मेश्राम यांनी साहित्य संमेलन हा आरसा असून पवनीतील परिवर्तन साहित्य संमेलन हे समाजाला नवीन दिशा देणार असल्याचे सांगितले.प्रास्ताविक मनोहर मेश्राम यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत तागडे यांनी केले. स्वागत गीत आठल्ये यांच्या मार्गदर्शनात वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी गायले. संमेलनात विदर्भातून मोठ्या संख्येने साहित्यीक सहभागी झाले होते.

टॅग्स :literatureसाहित्य