शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

धान खरेदी केंद्रांतील लुबाडणूक थांबवा

By admin | Updated: May 27, 2016 00:54 IST

शेतकऱ्यांची धान केंद्रावरील होत असलेली लुबाडणूक ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव देण्यात यावे, ...

भंडारा : शेतकऱ्यांची धान केंद्रावरील होत असलेली लुबाडणूक ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव मनोज बागडे यांनी केलेली आहे.जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या शेतकऱ्याकडे त्यांची ओलीताची सोय आहे अशा ठिकाणी बडीराजाने मोठ्या कष्टाने उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. परंतू शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. शेतकऱ्यांनी धानाची कापनी करून मळनी मार्च ते एप्रिल महिन्यात केलेली आहे परंतु शासनानी हे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून सुरू करण्यात यावे, असे आदेश आहेत. जेव्हा की एकाही तालुक्यात १५ एप्रिलला धान केंद्र सुरू केले नाही हे सर्व धान खरेदी केंद्र २० एप्रिलनंतर सुरू केलेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी वाट बघता बघता त्रासून गेलेत व त्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान कवडीमोलांनी म्हणजे १,२०० रूपये प्रती क्विंटल विकावे लागते.शासनानी जे केंद्र सुरू केलेत त्यातही मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसभरातून ३०० ते ४०० कट्ट्याच्यावर मोजमाप होत नाही. हे ईलेक्ट्रॉनिक वजनाद्वारे असते तर ते लवकर झाले असते व शेतकऱ्याचे नुकसान झाले नसते. प्रती कट्टा ४० किलोचा असून त्यामागे शेतकऱ्याकडून प्रती कट्टा ५ रूपये हमाली वेगळी घेतली जाते. शासनानी प्रती क्विंटल १,६१० रूपये देण्याचे ठरले असून त्यात १,४०० रूपये पहिल्यांदा देण्यात येतील व यावरील बोनस २१० रूपेय नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक शेतकरी उन्हाळी धान पिक प्रती एकरामागे २५ ते ३० क्विंटल धान पिकवित असतो. परंतु शासनानी शेतकऱ्यांना त्याचे धान प्रती एकरी १२ क्विंटलच धान खरेदी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)