शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह बंद

By admin | Updated: August 5, 2015 00:47 IST

खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे.

बावनथडी नदीचे पात्र आटले : राजीवसागर प्रकल्पाचे पाणी सोडा चुल्हाड (सिहोरा) : खरीप हंगामात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पंपगृह सुरू करण्यात आले. मात्र, पाण्याअभावी ३६ तासातच हे पंपगृह बंद करण्यात आले आहे. बावनथडी नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजीव सागर प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड सुरू झाली आहे.सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेतशिवारात हरितक्रांती घडवून आणण्याची क्षमता सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प आणि विस्तीर्ण चांदपुर जलाशयात आहे, असे महत्वपूर्ण प्रकल्प आणि जलाशय असताना नियोजन शुन्यतेमुळे यंदा पाण्याअभावी भिषण दुष्काळाचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. निर्धारित कालावधीचे धानाची नर्सरी शेतकऱ्यांनी निर्माण केली आहे. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने आशान्वीत शेतकऱ्यांनी या नर्सरीत खत आणि औषधाची फवारणी केली आहे. परंतु पाऊस बेपत्ता झाल्याने धानाची नर्सरी नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. शेतकऱ्यावंर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. स्वतंत्रदिनापर्यंत पाण्याअभावी मोठे संकट निर्माण होणार आहे. दरम्यान नाल्यांचे पाणी नदीपात्रात आल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे तीन पंपगृह सुरू करण्यात आले आहे. परंतु नदी पात्रातील पाणीच आटल्याने हे पंप ३६ तासात बंद करण्यात आले आहे. जलाशयात पाण्याची साठवणूक नगण्य आहे. यामुळे शेतकरी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची ओरड करीत आहे. या प्रकल्पाला आमदार चरण वाघमारे यांनी भेट देवून स्थितीचा आढावा घेतला आहे. संपूर्ण पंपगृह यंदा पाण्याचा उपसा करण्यासाठी तयार असताना निसर्गाने पाठ फिरविल्याने भयावह सकंटावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पंचायत समिती सभापती कविता बनकर, पंचायत समिती सदस्य विमल कानतोडे, मयुरध्वज गौतम, बाला तुरकर, गजानन निनावे आदी उपस्थित होते.शेतकरी बंडू बनकर, अंबादास कानतोडे, देवानंद लांजे यांनी आ. वाघमारे यांना शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजीव सागर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची चर्चे दरम्यान विनवणी केली. ३५ हजार शेतकरी व त्यांचे कुटूंब, जनावरांचा चारा आदी समस्या निर्माण होणार असल्याची माहिती माजी सभापती कलाम शेख यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचे नजरा राजीव सागर धरणातून सोडणाऱ्या पाण्याकडे लागलेल्या आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. (वार्ताहर)राकाँची पत्रपरिषदेत मागणीचांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्पाला पाण्याची गरज आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने राजीव सागर धरणाचे पाणी नदीत सोडण्याची मागणी बपेराचे जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर, सिहोराचे धनेंद्र तुरकर, चुल्हाडचे प्रतिक्षा कटरे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया रहांगडाले, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले यांनी केली आहे.नदीपात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडून प्रकल्प पाण्याचा उपसा करणार आहे. येत्या स्वतंत्र दिनापर्यंत अंतिम निर्णय पूर्ण झाला पाहिजे. याकरिता चुल्हाड बस स्थानकावर १५ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करणार आहे.- रमेश पारधी, माजी उपाध्यक्ष जि.प. भंडारा