शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महिलांवरील अत्याचार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 01:02 IST

देशातील आदिवासी समाज असंघटीत असल्याचा फायदा घेवून काही समाजकंटक स्त्रियांवर अत्याचार करीत आहे.

आदिवासी संघटनांची मागणी : जिल्हाधिकारी यांना निवेदनभंडारा : देशातील आदिवासी समाज असंघटीत असल्याचा फायदा घेवून काही समाजकंटक स्त्रियांवर अत्याचार करीत आहे. राजकीय दडपणामुळे व आर्थिक व्यवहारामुळे गुन्हेगार बिनधास्त समाजात वावरतांना दिसत आहेत. महिलांवरील अत्याचार थांबण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.पोलीस प्रशासनदेखील तक्रार दाखल करण्यास गेले पक्षावरच दबाव टाकतात ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अशा प्रशासनाच्या विरुध्द जतेच्या मनात रोष निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.भंडारा तालुक्यातील दिघोरी येथे तिघांनी एका अल्पवयीन मुलीवर भरदिवसा उचलून नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी कारधा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यापैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याचे कारण सांगून त्याला सोडण्यात आल्याचे कळते. त्या अल्पवयीन मुलाला रिमांड होममध्ये पाठविण्याची कारवाई करावी. तसेच लाखनी तालुक्यातील खुर्शीपार येथील एका आदिवासी महिलेसोबत परसोडी गावातील इसमाने अश्लील व जातीवाचक बोलून महिलेचा हात पकडून विनयभंग केला. आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा दाखल झालेला असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपीला कोणत्याही दबावाखाली न येता त्वरित अटक करुन कठोर शिक्षा मिळावी यादृष्टीने पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांचेमार्फत राज्यपाल यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोवर्धन कुंभरे, ज्ञानेश्वर मडावी, ए. बी. चिचामे, जी. के. मडावी, मन्साराम मडावी, श्याम नळपते, विनायक मडावी, सुभाष मडावी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)