शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

प्रवासी उत्पन्न घटल्याने एसटी कर्मचाऱ्यांना सतावतेय भविष्यातील पगाराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:35 IST

भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम एसटी महामंडळावर झाला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस अनेक दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. राज्य ...

भंडारा : कोरोना संसर्गाचा परिणाम एसटी महामंडळावर झाला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बस अनेक दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. राज्य शासनाने एसटी बसला अत्यावश्यक सेवेत गणले असले तरीही प्रवाशांचा मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद व वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. मात्र, दुसरीकडे दर महिन्याला चार कोटी रुपये पगारापोटी भंडारा विभागात खर्च होत आहेत. मात्र, त्यातुलनेत मालवाहू वाहतूक व अल्प प्रमाणात सुरू असलेली प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न मात्र महिन्याकाठी ४५ हजार इतकेच मिळत आहे. इतर खर्चासाठी पैसे लागत असल्याने एसटीचा तोटा अधिकच वाढत चालला आहे. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाला प्रत्येक आगारात असणारे चहाचे स्टॉल, फ्रूट स्टॉल, पेपर, पुस्तके दुकाने व अन्य मार्गातून भाड्याच्या स्वरूपात काही प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मात्र, आता ही दुकानेही बंद असल्याने त्याचाही फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे.

बॉक्स

शासनाने मदत न केल्यास पगार होणे अवघड होईल

राज्य शासनाने एसटी महामंडळाला एक हजार कोटींची मदत केल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत असले तरी भविष्यात मात्र उत्पन्न घटल्यामुळे पगार नियमित होतीलच याची शाश्वती कमी आहे. कोरोना संकटात एसटी चालकांनी व इतर कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा निभावली असल्याने शासनानेही महामंडळासाठी यापुढेही विशेष तरतूद करावी, अशी मागणी आहे.

कोट

संचारबंदीमुळे एसटीच्या प्रवासी बसफेऱ्या बंद होत्या. त्यामुळे आता लगेच प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. सध्या पगार नियमित मिळत आहे. मात्र, उत्पन्न असेच घटल्यास पगाराचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.

एसटी, कर्मचारी

कोट

सध्या सर्वच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनातही नियमित होत आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र, कोरोनामुळे एसटीची परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात कर्मचाऱ्यांना समस्या येऊ शकतात.

एसटी, कर्मचारी

कोट

राज्य शासनाने एसटी बसला अत्यावश्यक सेवेसाठी घोषित केले. सध्या आम्ही मालवाहतुकीतूनही उत्पन्न मिळवत आहोत. मात्र, प्रवासी वाहतुकीची सर येऊ शकत नाही. कोरोनामुळे पूर्वीच्या तुलनेत एसटीचे उत्पन्न खालावले आहे. मात्र, असे असले तरी एसटी महामंडळ भंडारा विभागातर्फे उत्पन्नवाढीसाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत.

डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

बॉक्स

प्रवासी काय म्हणतात

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असला तरीही शासनाने खासगी वाहने सुरूच ठेवली आहेत. त्याप्रमाणे एसटीच्या फेऱ्या कमी का असेना मात्र सुरू ठेवाव्यात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळू शकेल व एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल.

आजही अनेक प्रवासी एसटीची आतुरतेने वाट पाहतात. शासनाने प्रवासी आणि एसटी महामंडळ या दोघांच्या सोयीसाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.