शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

‘यशवंतराज’चे विभक्तीकरण

By admin | Updated: December 3, 2015 01:09 IST

स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन ...

शासन निर्णय : राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून सुरूवातभंडारा : स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणाऱ्या यशवंतराव पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार योजनेचे राज्य शासनाने यावर्षीपासून केंद्राच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून विभक्तीकरण केले आहे. राज्य शासनाकडून आता स्वतंत्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२०११ पासून केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालय व राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याकडून पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत होता. राज्य शासनाने गौरव केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांचाच गौरव पुन्हा केंद्र शासनाकडून यापूर्वी करण्यात येत असल्याने अन्य संस्थांनाही संधी मिळावी, या हेतूने राज्य शासनाने राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेतून राज्य शासनाकडून एकूण २ कोटी ७० लाखांची पारितोषिके उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येत आहेत. राज्यस्तरावर निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषदेसाठी २५ लाख, पंचायत समितीसाठी १७ लाख, तर ग्रामपंचायतीसाठी ७ लाखांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकासाठी पात्र संस्थांना १५ लाख, १२ लाख, ५ लाख, व तृतीय क्रमांकासाठी पात्र असणाऱ्या संस्थांना अनुक्रमे १० लाख, १० लाख, व ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत. विभागीय स्तरावरूनही पारितोषिके देण्यात येत आहेत.केंद्र शासनाने या वर्षीपासून या योजनेतून पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या स्थानिक संस्थांना आॅनलाईन माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आॅनलाईन प्रणालीनंतर मुल्यमापनानंतर केंद्र शासनाकडून या योजनेतील उत्कृष्ट संस्थांची नावे नंतर जाहिर करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने यावर्षीपासून ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळविण्यासाठी काही अटी सक्तीच्या केल्या आहेत. शंभर गुणांच्या मुल्यमापनाव्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायतींची करवसुली ५० टक्कयांपेक्षा कमी आहे, सर्व ग्रामसभांचा कोरम अपूर्ण आहे, सर्व पाणी तपासणी नमूने लाल कार्डात आहेत.मागासवर्गिय कल्याण निधी ७५ टक्केपेक्षा कमी आहे, गावातील एकूण कुटुंबापैकी ५० टक्कयांपेक्षा कमी कुटुंबाकडे शौचालये नाहीत, करांची फेररचना न करणे आदी ग्रामपंचायतींचा समावेश या योजनेच्या पुरस्कारासाठी न करण्यात आदेश देण्यात आले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत पंचायत समितीकडून चार उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर विभागीय स्तरावर शिफारस करण्यात येणार आहे. मार्चनंतर या अभियानातील संस्थांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)