शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंतराज’चे विभक्तीकरण

By admin | Updated: December 3, 2015 01:09 IST

स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन ...

शासन निर्णय : राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून सुरूवातभंडारा : स्थानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणाऱ्या यशवंतराव पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार योजनेचे राज्य शासनाने यावर्षीपासून केंद्राच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण योजनेपासून विभक्तीकरण केले आहे. राज्य शासनाकडून आता स्वतंत्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.२०११ पासून केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालय व राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याकडून पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत होता. राज्य शासनाने गौरव केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांचाच गौरव पुन्हा केंद्र शासनाकडून यापूर्वी करण्यात येत असल्याने अन्य संस्थांनाही संधी मिळावी, या हेतूने राज्य शासनाने राजीव गांधी पंचायत राज सशक्तीकरण अभियानापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेतून राज्य शासनाकडून एकूण २ कोटी ७० लाखांची पारितोषिके उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येत आहेत. राज्यस्तरावर निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषदेसाठी २५ लाख, पंचायत समितीसाठी १७ लाख, तर ग्रामपंचायतीसाठी ७ लाखांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकासाठी पात्र संस्थांना १५ लाख, १२ लाख, ५ लाख, व तृतीय क्रमांकासाठी पात्र असणाऱ्या संस्थांना अनुक्रमे १० लाख, १० लाख, व ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येत आहेत. विभागीय स्तरावरूनही पारितोषिके देण्यात येत आहेत.केंद्र शासनाने या वर्षीपासून या योजनेतून पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या स्थानिक संस्थांना आॅनलाईन माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आॅनलाईन प्रणालीनंतर मुल्यमापनानंतर केंद्र शासनाकडून या योजनेतील उत्कृष्ट संस्थांची नावे नंतर जाहिर करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने यावर्षीपासून ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळविण्यासाठी काही अटी सक्तीच्या केल्या आहेत. शंभर गुणांच्या मुल्यमापनाव्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायतींची करवसुली ५० टक्कयांपेक्षा कमी आहे, सर्व ग्रामसभांचा कोरम अपूर्ण आहे, सर्व पाणी तपासणी नमूने लाल कार्डात आहेत.मागासवर्गिय कल्याण निधी ७५ टक्केपेक्षा कमी आहे, गावातील एकूण कुटुंबापैकी ५० टक्कयांपेक्षा कमी कुटुंबाकडे शौचालये नाहीत, करांची फेररचना न करणे आदी ग्रामपंचायतींचा समावेश या योजनेच्या पुरस्कारासाठी न करण्यात आदेश देण्यात आले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत पंचायत समितीकडून चार उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर विभागीय स्तरावर शिफारस करण्यात येणार आहे. मार्चनंतर या अभियानातील संस्थांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)