शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
4
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
5
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
6
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
7
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
8
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
9
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
10
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
11
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
12
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
13
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
14
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
15
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
16
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
17
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
18
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
19
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
20
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा

उड्डाणपुलाच्या बांधकामाला वेग, तज्ज्ञांचे पथक केव्हा येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व ...

तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. रेल्वे व राज्य शासनाच्या अखत्यारीतील उड्डाणपुलाच्या बांधकामाला पुन्हा वेग आला आहे, परंतु उड्डाणपूल भरावातून निघणाऱ्या राखेमुळे बांधकाम सुमारे चार ते पाच महिने बंद होते. दिल्ली येथील तज्ज्ञांचे पथक येऊन पाहणी करणार होते. पथक अजूनपर्यंत आले नाही, परंतु राज्य शासनाने पुन्हा उड्डाणपुलाच्या पोच मार्ग बांधकामाला पुन्हा वेग आला आहे.

देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपूल बांधकामाला हिरवी झेंडी दिली होती. सुमारे सहा वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले होते.

अजूनपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दर दिवशी रेल्वे फाटकावर वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूककोंडी होत आहे. रेल्वे प्रशासन व राज्य शासन येथे संयुक्तरीत्या उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकवरील गडर लॉन्चिंगचे काम यशस्वीपणे केले. गडर लॉन्चिंग झालेल्या ठिकाणी सिमेंट घालण्याकरिता सेंट्रिंगचे काम सुरू आहे. राज्य शासनाचे उड्डाणपुलाचे पोच मार्गाचे काम पुन्हा सुरू केले आहे. मागील सहा महिने हे काम बंद होते, हे विशेष.

उड्डाणपुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आला होता. दोन्ही मार्गांच्या पोच मार्गावर पुलाच्या भरावातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघत होती. त्यामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दगडी पुलातून राख बाहेर निघत असल्यामुळे उड्डाणपुलात खड्डे निर्माण झाल्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बांधकाम विभागाने हे काम थांबविले होते.

उड्डाणपुलातून निघालेली राख निघण्याचे कारण येथे शोधण्याकरिता दिल्लीच्या तज्ज्ञ पथकाला येथे पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे, परंतु अजूनपर्यंत दिल्लीचे पथक येथे आले नाही. पोच मार्गाचे काम पुन्हा येथे सुरू करण्यात आले आहे.

सध्या पोच मार्गावर काळी गिट्टी घालून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे, परंतु पुलांमध्ये पोकळी असली, तर येथे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. पोच मार्गाचे काम पूर्ण होण्याच्या अगोदर दिल्ली येथील तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण पुलाचे निरीक्षण करण्याची गरज आहे. सदर पूल हा दगडी असून, त्यात राखेच्या भराव करण्यात आला होता. पुलाच्या चारही बाजूला राख वाहून जाऊ नये, म्हणून पातळ पॉलिथिनच्या वापर करण्यात आला; परंतु काही ठिकाणी पॉलिथिन फाटल्याने ही राख पुलाच्या भरावातून निघत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे येथे वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण पुलाचे निरीक्षण करण्याची गरज आहे.