शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरीमुळे चिमण्या गायब

By admin | Updated: April 19, 2015 00:39 IST

धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

चिवचिवाट बंद : विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर भंडारा : धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्याचा चिवचिवाट कायमचा बंद झाला. शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारे दिसेनासे झाले आहेत. चिमण्यांपाखरासोबत नातीगोती जपणार्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरावर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवितात. पशू पक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्षांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी सुप्रभाती सडासारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवंशमचा जमाना आला. कुणालाही सडासारवण करण्याची गरज वाटत नाही. त्या भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेल्या. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करुन मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात सापडले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले, मानवी जीवन विविध आजाराने वेढला गेला. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे.निसगार्तील पशुपक्षी काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळयासुध्दा नाहीशा झाल्याने पशुपक्ष्यांवर उपासमारी येऊ लागली आहे. ग्रामीण भागातील चिमण्या केवळ बोटावर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठया इमारतींमुळे सिंमेटचे जंगल तयार झाल्याने शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा झाला. पर्यावरणवाद्यांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत असल्याचे काहींचे मत आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घरासमोर घरटे व पाण्याची व्यवस्था करुन चिमणी पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.(नगर प्रतिनिधी)