शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 28, 2014 23:24 IST

जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी.

पाऊस बेपत्ता : जूनअखेरपर्यंत जिल्हा कोरडाच, शेतकरी हवालदिलभंडारा : जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी. मात्र पावसाने दडी मारल्याने केलेल्या पऱ्हे मातीत मिसळतात की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. गतवर्षी खरिपाच्या हंगामात १३ जूनला झालेला दमदार पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होता. त्यावेळी अतिवृष्टीने तर यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी केव्हा होईल, या आशेने बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जलसाठा अत्यल्प राज्यातील धरणांचा जलसाठा अल्प प्रमाणात उरलेला आहे. जलसाठ्याची सरासरी १९ टक्क्यांवर आली आहे. अल्प जलसाठ्यामुळे त्यावर अवलंबून असणारा शेतकरी चिंतेत असून पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या शहराची स्थितीसुद्धा बिकट आहे. उकाडा कायमजून महिना संपायला दोन दिवस शिल्लक असले तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. उन्हाची दाहकता कमी झाली नाही. कडक उन्हामुळे उकाडा कायम आहे. जून महिन्यातील या उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. बियाणांची साठवणूक पाऊस लांबल्यामुळे याचा परिणाम बाजारावर बघावयास मिळत आहे. शेतातील पेरण्या रखडल्यामुळे बियाण्यांची विक्री मंदावली आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या शक्यतेने बियाण्यांची व्यापारी वर्गाकडून अधिक साठवणूक होताना दिसत आहे. एकूणच मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांसह नोकरदार सर्वांवर बसत असून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पाऊस कुठे अडलासानगडी : यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापुर्वीच वर्तविला होता. मान्सून दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता वाढली आहे. ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होता. मागीलवर्षी वेळेवर दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी जिल्हा कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेतजमिनीची तयार करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवे येण्याची वेळ आली आहे. नागपूर विभागात सर्वधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात केवळ ६४.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात ६९.६४ मि.मी., वर्धा ६०.६६, भंडारा ५४.२९, गोंदिया ८९.६३, चंद्रपूर ४७.०१, गडचिरोली जिल्ह्यात ६३.४३ मि.मी. पाऊस झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)