शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 28, 2014 23:24 IST

जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी.

पाऊस बेपत्ता : जूनअखेरपर्यंत जिल्हा कोरडाच, शेतकरी हवालदिलभंडारा : जून महिना संपायला येत असतानाही जिल्ह्यात पाहिजे तशी पावसाची दमदार हजेरी लागली नाही. मध्यंतरी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली होती खरी. मात्र पावसाने दडी मारल्याने केलेल्या पऱ्हे मातीत मिसळतात की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे. गतवर्षी खरिपाच्या हंगामात १३ जूनला झालेला दमदार पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होता. त्यावेळी अतिवृष्टीने तर यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. वरुणराजाची कृपादृष्टी केव्हा होईल, या आशेने बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जलसाठा अत्यल्प राज्यातील धरणांचा जलसाठा अल्प प्रमाणात उरलेला आहे. जलसाठ्याची सरासरी १९ टक्क्यांवर आली आहे. अल्प जलसाठ्यामुळे त्यावर अवलंबून असणारा शेतकरी चिंतेत असून पिण्याच्या पाण्यासाठी धरणावर अवलंबून असलेल्या शहराची स्थितीसुद्धा बिकट आहे. उकाडा कायमजून महिना संपायला दोन दिवस शिल्लक असले तरी मान्सूनचे आगमन झाले नाही. उन्हाची दाहकता कमी झाली नाही. कडक उन्हामुळे उकाडा कायम आहे. जून महिन्यातील या उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. बियाणांची साठवणूक पाऊस लांबल्यामुळे याचा परिणाम बाजारावर बघावयास मिळत आहे. शेतातील पेरण्या रखडल्यामुळे बियाण्यांची विक्री मंदावली आहे. त्यामुळे याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या शक्यतेने बियाण्यांची व्यापारी वर्गाकडून अधिक साठवणूक होताना दिसत आहे. एकूणच मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांसह नोकरदार सर्वांवर बसत असून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पाऊस कुठे अडलासानगडी : यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापुर्वीच वर्तविला होता. मान्सून दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता वाढली आहे. ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होता. मागीलवर्षी वेळेवर दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी जिल्हा कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेतजमिनीची तयार करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवे येण्याची वेळ आली आहे. नागपूर विभागात सर्वधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात केवळ ६४.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात ६९.६४ मि.मी., वर्धा ६०.६६, भंडारा ५४.२९, गोंदिया ८९.६३, चंद्रपूर ४७.०१, गडचिरोली जिल्ह्यात ६३.४३ मि.मी. पाऊस झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)