शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST

उन्हाळी चा हंगाम होणार प्रभावित पालांदूर : भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांचे ...

उन्हाळी चा हंगाम होणार प्रभावित

पालांदूर : भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. नोव्हेंबर महिन्यापासून खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. ३१ मार्च धान खरेदीची शेवटची घटका आहे. परंतु पाच महिन्याचा कालावधी लोटूनही खरेदी केलेल्या धानाची भरडाई करीता उचल न झाल्याने धान खुल्या नभाखाली त्रिपाल च्या आधाराने पडून आहे.

आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांना तारणहार ठरलेला आहे.

शासनाच्या आधारभूत केंद्रावर शेतकरी हक्काने स्वतःच्या सातबाऱ्यावर धान विक्री करतो. यावर शासनाच्यावतीने मूळ किमती व्यतिरिक्त प्रोत्साहन राशी अर्थात बोनस सुद्धा देतो. त्यामुळे शेतकरी राजा आपला हंगाम आधारभूत केंद्रावर विकून मोकळा होतो. परंतु आधारभूत केंद्राने खरेदी केलेला धान पुढे भरडाई साठी उचल न झाल्याने धान संकटात सापडलेले आहेत. अवकाळी पावसाच्या दणक्यात धानाला सडका वास सुद्धा येत आहे. खरेदी केलेल्या धानाचा हिशेब शासनाला तंतोतंत पुरवण्याची जबाबदारी खरेदी केंद्रावर असते. यात खराब झालेल्या धानाचा नुकसान शासनाच्या वतीने तूट भरून मिळत नाही. त्यामुळे आधारभूत केंद्र शेतकऱ्यांचे आधार ठरलेले स्वतः मात्र निराधार होत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताकरिता खुल्या नभाखाली धान मोजणी करण्यात आले.

गोडाऊन उपलब्धता अत्यल्प असल्याने व शेतकऱ्यांचे धान मोजणे अत्यावश्यक झाल्याने खुल्या जागेत धान मोजल्या शिवाय पर्याय नव्हता. लोकप्रतिनिधींनी सुद्धा मोजणी करिता प्रोत्साहित केले. मात्र आता धानाची उचल होत नसल्याने मध्यस्थीची भूमिका लोकप्रतिनिधींनी निभवावी अशी अपेक्षा आधारभूत धान खरेदी केंद्राकडून व्यक्त होत आहे.

दि भगीरथ भात गिरणी मुरमाडी तुपकर अंतर्गत आधारभूत केंद्राच्या मध्यस्थीने ४५००० (पंचेचाळीस हजार) क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. यातून भरडाई करिता केवळ २२००कट्टे ची उचल झालेली आहे. बाकी सर्व धान केंद्रात पडून आहे. उर्वरित धान झाकण याकरिता ७५०००₹ च्या त्रिपाल खरेदी करण्यात आलेले आहेत.

जिल्हा पणन कार्यालयाने आधारभूत खरेदी केंद्राच्या समस्यांची जाणीव ठेवून तात्काळ भरडा याचा प्रश्न निकाली काढावा.

मधुकर झंझाळ संचालक दी भगीरथ भात गिरणी मुरमाडी (तुपकर)

उताऱ्याची समस्या कायम!

धान भरडाई झाल्यानंतर मिलर्सनी शासनाला ६७ टक्के एवढे तांदूळ देणे आवश्यक आहे. परंतु हंगामाचा अभ्यास केला असता केवळ ६० टक्के एवढाच उतारा निघालेला आहे. त्यामुळे ७ टक्क्याची उताऱ्याची समस्या कायम आहे. या समस्या करिता लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील सचिव यांनी पुढाकार घेत शेतकर्‍यासह आधारभूत खरेदी केंद्रांना न्याय द्यावा. खरेदी केलेला धान १ मे पूर्वी न उचलल्यास उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित होण्याची दाट शक्यता उभी झालेली आहे. गतवर्षी ला सुद्धा उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावित झाला होता हे विशेष!