शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST

चुल्हाड (सिहोरा ) : तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात चार पंप नादुरुस्त असल्याने पाण्याचा उपसा अडचणीत आला ...

चुल्हाड (सिहोरा ) : तुमसर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात चार पंप नादुरुस्त असल्याने पाण्याचा उपसा अडचणीत आला आहे. उर्वरित सुरू असणारे पाच पंप सलाईनवर असल्याने कोणत्याही क्षणी पाण्याचा उपसा थांबण्याची शक्यता आहे. निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांनी पंपगृहाकडे दुर्लक्ष केल्याने संकट कोसळले आहे. पंपाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा फटका ११० कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाला बसला असून प्रकल्पच बंद होण्याच्या मार्गावर आला आहे.

बावनथडी नदीच्या पात्रातून पाणी उपसा करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात नवे संकट निर्माण झाले आहे. नऊ पंप असणाऱ्या या प्रकल्पात चार पंप नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त पंपाचे साहित्य बेपत्ता झाले आहेत. तीन वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने नादुरुस्त पंप प्रकल्प स्थळात आणले नाहीत. नागपुरात दुरुस्तीसाठी देण्यात आले असल्याची दिशाभूल माहिती सांगत आहेत. जे पंप दुरुस्तीकरिता जातात, ते पंप कधी परतले नाहीत. यामुळे प्रकल्पस्थळात सध्या स्थित पाच पंपांनी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. पाणी उपसा करणारे पाच पंप सलाईनवर आहेत. पाणी उपसा करणारे पाचही पंप कोणत्याही क्षणात बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे नदीपात्रातून पाण्याचा उपसा थांबणार आहे. निविदा कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्प स्थळात संकट ओढवले आहे. या प्रकल्पात अनेक वर्षांपासून निविदा कंत्राटदाराने भेट दिली नाही. यंत्रणेतील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन नागपूर, भंडाऱ्यातून प्रकल्पाचा डोलारा सुरू ठेवण्यात आलेला आहे. नादुरुस्त पंपाचा थांगपत्ता नाही.

बॉक्स

एकाच परिचालकाच्या खांद्यावर ओझे

पंपगृह संचालनासाठी तीन परिचालकांची नियुक्ती करण्याचे नियोजित आहे. परंतु या प्रकल्पात एकाच परिचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्र आणि दिवस या एकाच परिचालकाला अल्प मानधनावर कामे करावी लागत आहेत. पंपगृह संचालनासाठी परिचालकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी निविदा कंत्राटदार प्रकाश मेश्राम यांची आहे. परंतु पैशांची बचत करण्यासाठी उर्वरित पदे भरण्यात आले नाहीत. अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत प्रकल्पस्थळात अनागोंदी कारभार सुरू असताना सारेच गहिवरल्यासारखे वागत आहेत. प्रकल्प स्थळातील पंपगृहाचे वाटोळे करणाऱ्या निविदा कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडा

पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असल्याने शेत शिवारात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. धान पिकांना पाण्याची गरज आहे. टेलवरील शेत शिवारात पाणीच नसल्याने खत व फवारणीची कामे अडली आहेत. चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यासाठी जलद गतीने निर्णय घेतले पाहिजेत. तत्पूर्वी पाणी सोडताना पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराचे निरीक्षण केले पाहिजे. यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी केली आहे.