शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:44 IST

सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या मार्गी लावण्याची मागणी गोसे खुर्द प्रकल्पबाधीत सौंदड, खापरी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यथा कुटुंबीयांसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

प्रकाश हातेल।आॅनलाईन लोकमतचिचाळ : सौंदड, खापरी पुनर्वसनातील समस्या मार्गी लावण्याची मागणी गोसे खुर्द प्रकल्पबाधीत सौंदड, खापरी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. समस्या १५ दिवसात मार्गी न लावल्यास प्रकल्पग्रस्त कुटूंबियासह रसस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी, आयुक्त पुनर्वसन नागपूर व मुख्य अभियंता गोसे खुर्द यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. त्यामुळे पुनर्वसन राष्ट्रीय पुनर्वसन धोरणाप्रमाणे करावे, प्रकल्पात ८५ गावे आणि १९,५६५ हे.आर. सुपिक जमीन ब्रिटीशकालीन १८९४ कायद्यान्वये संपादीत झाली आहे. मात्र या कायद्याविरोधात ज्या शेतकºयांनी जिल्हा न्यायालय व नागपूर न्यायालयात दाद मागितली त्यांना प्रतीहेक्टरी १० ते १५ लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच प्रमाणे उर्वरीत शेतजमिनीला १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, दि.१८ जून २०१३ ला विशेष पॅकेज मध्ये प्रती एकर ८० हजार रुपये दिले. त्याऐवजी ८ लाख रुपये प्रती एकरी द्यावे, तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बाधीत कुटुंबांना शासकीय नोकरी किंवा त्याऐवजी २५ लाख रुपये देण्यात यावे, गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त मासेमारांना जलाशयामध्ये मासेमारीचे अधिकार देवून आधुनिक व तंत्र व प्रशिक्षण द्यावे, प्रकल्पग्रस्तांना बीपीएलमध्ये समाविष्ट करावे, प्रकल्पग्रस्तांना वृद्धापकाळाची पेंशन, विधवा, निराधार, दिव्यांग यांना आजीवन पेंशन देण्यात यावी, पुनर्वसीत गावठाणात सर्व नागरी सुविधा दर्जेदार व टिकावू स्वरुपाच्या करून द्याव्यात, धरणावर चालणाऱ्या सर्व उद्योगाच्या सीएसआर फंडातून थेट निधी संबंधित ग्रामपंचायतींना सन २०५५ पर्यंत देण्यात यावी, प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षण व उच्चशिक्षण प्राधान्याने आणि मोफत देण्यात यावी, गावठाणात संपूर्ण मागण्या व नागरी सुविधा झाल्याशिवाय विद्युत बिल व घरटॅक्स भरणार नाही, नवीन गावठाणात उन्हाळ्यात विहिरी आटत असल्याने घरबांधणी व पाण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी, गावठाणाला लागून असलेली स्मशानभूमी लोकभावनेच्या दृष्टीने ही जागा बदलून गावापासून दीड कि.मी. अंतरावर देण्यात यावी, समाजमंदिर, शाळा, ग्रा.पं. प्रांगणात मुरुम टाकून सपाटीकरण करून द्यावे, कलम ४ नंतर बांधकाम केलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्याचा लाभ संबंधित कुटुंबांना देण्यात यावा, वाढीव कुटुंबांना नवीन शासन धोरणानुसार पॅकेजचा पूर्ण लाभ देण्यात यावाआदी मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात राजहंस भुते, भीमराव आडकिने, मुकुंदा गजभिये, बुधा भुते, रिमराज सेलोकर, भाऊराव सेलोकर, आदेश गजभिये, भाऊराव भुते, वसंत मेश्राम, प्रेमलाल मेश्राम, चंद्रभान भुते, डी.सी. केवट, काशिनाथ रामटेके, शालीक भुते, सुनिल भुते, सखाराम तितीरमारे, लक्ष्मण तितीरमारे, भीमाबाई बोरकर, कवळू भुते, पुरुषोत्तम भुते, सहादेव गरपडे, भारत मारबते, मनोहर मारबते, ताराचंद भुते, नाशिक खंगार आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.