शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

यावेळी दिलेल्या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील ...

यावेळी दिलेल्या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून खंड दोन प्रसिद्ध करावा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन वाढवून अनुक्रमे ३० व ४० हजार रुपये करावेत, प्राथमिक शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश देऊन भेदभाव थांबवावा, २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अंशदान पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या मृत्यू झाल्यावर वारसाला विनाअट दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी १०, २०, ३० ची आश्वासित योजना लागू करावी, वस्ती शाळेत नेमणूक केलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी फी माफीसाठी आर्थिक तरतूद करावी, उच्च प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापक व सेवक पदाला मान्यता द्यावी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसाठी संगणक ऑपरेटर किंवा लिपिकाची पद मान्य करावे, राज्यात १९९२ नंतर निर्माण केलेल्या नवीन तालुक्यातील गटशिक्षण कार्यालयात लिपिक व सेवकांच्या पदास मान्यता द्यावी, केंद्रप्रमुखांची राज्यातील रिक्त असलेली ८० टक्के पदी पदवीधर शिक्षकांतून भरण्यात यावी, शिक्षकांना बीपीएल इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे जिल्हा परिषद शाळेतील वीज देयके जिल्हा परिषदेच्या फंडातून भरण्यात यावी, अप्रशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी मूळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरावा, उच्चश्रेणी, विषयशिक्षक या पदोन्नत्या कराव्यात, उच्चशिक्षित शिक्षकांना त्याच्या धारकतेनुसार विकल्पाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून बढती द्यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीचे रखडलेले प्रकरणे निकालात काढून सर्व पात्र शिक्षकांना लाभ घ्यावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती तसेच इतर थकबाकीसाठी आर्थिक तरतूद करावी, दर महिन्याच्या पगारासाठी आवश्यक निधी आधीच वळता करावा, पगारासाठी सीएमपी पद्धतीचा अवलंब करावा आदी मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात शिष्टमंडळासमवेत बैठक घेऊन प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संघाच्या शिष्टमंडळाला दिले.

जिल्हा संघ भंडाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, सुधीर वाघमारे, राजेश सूर्यवंशी, मुकेश मेश्राम, राजू सिंगणजुडे, संजीव बावनकर, रमेश काटेखाये, दिलीप बावनकर, राधेश्याम आमकर, राजन सव्वालाखे, शंकर नखाते, नरेश देशमुख, विनायक मोथरकर, सेवकराम हटवार, रमेश लोणारे, रजनी करंजेकर, दिलीप गभने, भास्कर खेडीकर, अशोक मेश्राम आदींनी राज्य संघाचे आभार मानले.