शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सौर पथदिव्यांनी होणार दलित वस्त्या 'प्रकाशमान'

By admin | Updated: February 1, 2015 22:50 IST

दलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत.

प्रशांत देसाई - भंडारादलित वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावे व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील दलित वस्तीत सौर पथदिवे लावण्यात येत आहे. यातून जिल्ह्यातील १ हजार १५० दलित वस्त्या प्रकाशमान होणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. या अनुशंगाने, दलित समाज बांधवांचे जीवनमान उंचावे यासाठी, शासनाने समाजकल्याण विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधींचा निधी खर्च केल्या जातो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातून दलित वस्तीत नाली, रस्ता व समाजमंदिर बांधकाम करण्यात येते.या विकास कामांसोबतच शहरी भागातील दलित वस्ती वगळता आता ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार १५० दलित वस्त्यांमध्ये हे सौर पथदिवे लावण्याचे काम सुरू झाले आहे. यातील काही वस्त्यांमध्ये सौर पथदिवे लागले आहे. या योजनेतून दलित वस्त्या प्रकाशमान होणार आहेत. यात सर्वाधिक ५०२ सौर पथदिवे भंडारा पंचायत समितीअंतर्गत गावांमध्ये लागणार आहेत.गणेशपूर ग्रामपंचायतीतील दलित वस्तीत ३२ सौर पथदिवे लावण्यात येणार आहेत. दलित वस्तीच्या विकासासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने ४७ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यात २५ ग्रामपंचायतींच्या ३० वस्त्यांचा समावेश आहे. यासाठी २ कोटी ३ लाख २७ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या पुढाकारातून जिल्यातील दलित वस्ती सुधार योजनेचे कार्य झपाट्याने मार्गी लावण्यात येत आहे. दलित बांधवाना मिळणा-या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळावा या उद्दात्त हेतूने समाज कल्याण विभागातील कर्मचारी कार्य करीत आहेत.