शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

‘टेकेपार’चा कालवा फुटला ‘सालेबर्डी’च्या शेतात माती

By admin | Updated: July 16, 2014 23:54 IST

संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे.

प्रशासनाकडून बेदखल : सालेबर्डी गावात १० एकरातील धान पऱ्हे मातीत दबलेभंडारा :   संततधार पावसामुळे अचानक प्रवाह वाढल्यामुळे वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला टेकेपार उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटला. सुमारे तीनशे मीटर लांबीच्या नहराच्या पाळीला ठिकठिकाणी मोठमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतात मातीच माती पसरल्यामुळे अंदाजे १० एकरातील धानाचे पऱ्ह्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नहर नुतनीकरणाचे पितळ उघडे पडले आहे. मंगळवारला सायंकाळी सहा वाजता झालेल्या या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता नहरातून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांनी सांगितलेल्या नुकसानाची प्रशासनाने दखल घेतली नाही. याप्रकरणी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत शेतकरी म्हणाले, नहर आणि शेताची पाहणी करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने सालेबर्डीला भेट दिली नाही.मंगळवारला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, टेकेपार उपसा सिंचन योजनेची सालेबर्डीहून वाहणाऱ्या नहराची पाळ ठिकठिकाणी फुटली आणि नहराचे पाणी पाळीची माती शेतात शिरली. याची माहिती होताच गावातील नागरिक त्याठिकाणी जमा झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या आंबाडी कार्यालयाला सूचना दिली. रात्री पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच ‘लोकमत’ने आज बुधवारला सालेबर्डीला भेट दिली असता, नहराच्या पाळीला अंदाजे ३०० मीटर एवढ्या भागात ठिकठिकाणी तडे गेले होते. सुमारे अडीच एकर शेतात माती भरलेली दिसून आली. याशिवाय शेतात पाणी शिरल्यामुळे धुरे फुटले. याचा फटका परिसरातील १० एकर शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक प्रभावित शेतकरी रोशन उरकुडे शेतीचे हाल सांगताना म्हणाले, तीन एकरात मशीनने पेरणी केली. त्यामुळे शेत हिरवेगार झाले होते. परंतु आता त्यांच्या शेतात माती पसरली आहे. त्यामुळे उरकुडे आणि त्यांच्या शेजारी शेत असलेले प्रशांत निंबार्ते यांच्या शेतातील पीक नष्ट झाले आहे. काल फुटलेल्या नहरातील पाणी आजही वाहत होते.टेकेपार उपसा सिंचन योजना वैनगंगा नदीतील पाण्याचा उपसा करुन नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते. नहराची पाळ क्षतिग्रस्त झाल्यामुळे पिक होणे कठिण झाले आहे. पाणी सोडण्यापूर्वी नहराची पाळ मजबूत करणे आवश्यक होते. पाळीची दुरुस्ती केल्याशिवाय नहराचे पाणी सोडले तर सालेबर्डीसह परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)