शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

मऱ्हेगाव, नरव्हा, वाकल रेती घाटावर तस्करांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:24 IST

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात रेती तस्करी हा विषय नवीन नाही. जिल्ह्यातील ५१ रेतीघाटांपैकी केवळ सुमारे पाचच रेतीघाट लिलावात निघाले आहेत. ...

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात रेती तस्करी हा विषय नवीन नाही. जिल्ह्यातील ५१ रेतीघाटांपैकी केवळ सुमारे पाचच रेतीघाट लिलावात निघाले आहेत. उर्वरित रेती घाट लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत. गत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव निघून पवनी तालुक्यातील दोन, भंडारा तालुक्यातील दोन तसेच साकोली तालुक्यातील एक, असे पाच रेती घाट लिलावात निघालेले आहेत. उर्वरित रेती घाट नियमांच्या व रकमेच्या अतिरेकीपणामुळे लिलावात पास न झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. रेतीघाट तीन वर्षांकरिता लिलावात काढण्यात आलेले आहेत. परंतु वाळू उपसा करण्याचा अंतिम मुहूर्त व विकण्याचा मुहूर्त हा १० जून असल्याचे ऐकिवात आहे. त्यापुढे आणखी नियमांची बांधिलकी असल्याने वाळू उपसा लिलावधारकांना बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे जटिल नियमांमुळे लहान नदीपात्रातील अर्थात चुलबंद, सूर नदी घाटातील रेतीचे लिलाव संकटात आले आहेत. लिलावाचा पुढील मुहूर्त ३ मार्चला नियोजित असल्याचे समजते.

चौकट

गावकऱ्यांचे सहकार्य

नदीकाठावरील गावकऱ्यांचे रेती तस्करांना सहकार्य मिळत आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय रेती तस्कर तस्करी करू शकत नाहीत. प्रशासनाने कितीही प्रयत्न केले, तरी तस्करांना इत्यंभूत माहिती पुरविण्याचे काम काही नदीकाठालगतचे गावकरी करत असतात. रेती तस्करांकडून महिन्याकाठी किंवा दिवसाकाठी निश्चित रूपाने आर्थिक व्यवहार ठरलेला असतो. हा निधी गावाच्या कामाकरिता वापरून गाव विकासाकडे निधी वाढविला जातो.

चौकट

महाभाग कमी नाहीत

अवैध वाळू उपसा करण्याकरिता अप्रत्यक्षरित्या शासनच रेतीतस्करांना मोकळीक देत आहे. गत दोन वर्षांपासून पर्यावरण विभागाचे कारणमीमांसा दाखवून रेतीघाट लिलावात निघालेले नाहीत. परंतु लिलावात न निघालेल्या रेती घाटात जिल्हाधिकारी किंवा खनिकर्म विभागाच्या माध्यमातून रेती घाटावर विशेष व्यवस्था लावून रेती घाट अवैध उपशापासून प्रतिबंध घालता येणे शक्य होते. मात्र यात मोठ्या राजकारण्यांनी आडकाठी धोरण आखत तस्करांना रान मोकळे केले म्हणायला हरकत नसावी.