शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

स्मितहास्याने सोडला परीक्षेचा नि:श्वास !

By admin | Updated: March 22, 2015 01:33 IST

हुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

राजू बांते  मोहाडीहुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शुक्रवारला शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. विद्यार्थी जीवनात महत्त्वाची समजली जाणारी दहावी-बारावीची परिक्षा संपली आहे. यावर्षी मोहाडी तालुक्यात दहावी-बारावीच्या परिक्षेत एकही विद्यार्थी नकला करताना सापडला नाही. जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीविरोधी मोहिमेचे हे यश असल्याचे दिसून आले. परीक्षा मंडळाने गैरप्रकाराविरुध्द लढा चालविला. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या लढ्याला यश येत नव्हते. स्थानिक प्रशासनाने परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी केली. तेव्हापासून परिक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण आले. ग्रामीण भागातही कॉपीमुक्त परिक्षा होवू शकतात. ग्रामीण विद्यार्थ्थानी दाखवून दिले आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी सच्चिंद्र सिंह यांनी सुरू केलेली ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी सुरू ठेऊन कॉपीमुक्त अभियान राबविले. या अभियानामुळे पुढच्या काळात सकारात्मक व गुणात्मक बदल येणार आहेत. मागील १० वर्षापूर्वीचा परीक्षा केंद्रावरचे चित्र शिक्षण क्षेत्राला नासविणरे होते. आज चित्र पालटले आहे. परीक्षा केंद्रावरच्या भोवती होणारी गर्दी थांबली आहे.