शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज

By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल.

देवतळे यांचे प्रतिपादन : भंडारा नगर पालिकेचा उपक्रमभंडारा : कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल. नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या दिनदयाळ अंत्योदय योजना, उपजिविका अभियानांतर्गत कौशल्य विषयाचे तरूण-तरूणींनी प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करून कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी रवींद्र देवतळे यांनी केले.जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व राष्ट्रीय नागरी उपजीिवका अभियानांतर्गत नगर परिषद आणि राबीया मॉयनारीटी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने कौशल्य प्रशिक्षण मेळावा बाबा मस्तानशहा वॉर्डातील कम्युनिटी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन हाजी अब्दुल सलाम पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक बालाजी मरे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे, अशपाक पटेल, साकाबुद्दीन खान, अनिक जमा उपस्थित होते. यावेळी बालाजी मरे म्हणाले, कौशल्य उद्योजकता अभियानांतर्गत शासनाकडून विविध योजना सुरू आहेत. या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचता यावी. याकरीता कौशल्य मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून लाभार्थ्यांनी आपल्या गरजेनुसार प्रशिक्षण विषयाची निवड करुन सफलता पूर्वक प्रशिक्षण पूर्ण करावे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना एन.सी.व्ही.टी.चे प्रमाणपत्र देण्यात येते. यावेळी प्रवीण पडोळे म्हणाले, राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या ३४५ लाभार्थ्यांचे विविध विषयांतर्गत प्रशिक्षण सुरु करण्यात आले असून त्यापैकी २४७ लाभार्थ्यांचे मार्च २०१६ अखेर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले. व्यक्तिगत रोजगार सुरू करण्याकरिता स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत भांडवल उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्यांनी या अभियांनातर्गत घेतलेल्या कर्जावरील सहा टक्के व्याजावरील अनुदान देण्यात येते. शहरातील बेरोजगार युवक-युवतींनी बाजारातील औद्योगिक गरजेनुसार व आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले. सदर कौशल्य प्रशिक्षण मेळाव्यात २५० लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी ९० बेरोजगार युवक- युवतींनी विविध प्रशिक्षणामध्ये आपल्या नावाची नोंद केली. प्रास्ताविक राजू पटेल यांनी केले. मेळाव्यासाठी शहर अभियान कक्षाचे व्यवस्थापक अनिल जिरापुरे, समुदाय संघटक उषा लांजेवार, रेखा आगलावे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)